शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

ज्यांना दिले कंत्राट त्यांनाच बोलवा प्रचाराला!

By admin | Updated: October 4, 2014 23:19 IST

गेल्या पाच वर्षांत शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी यांसह अन्य योजनांचा कोट्यवधी रूपयांचा निधी आमदारांनी खेचून आणला. कामे मात्र मतदारसंघातील तुरळक कंत्राटदार वगळता अन्य

गजानन मोहोड - अमरावतीगेल्या पाच वर्षांत शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी यांसह अन्य योजनांचा कोट्यवधी रूपयांचा निधी आमदारांनी खेचून आणला. कामे मात्र मतदारसंघातील तुरळक कंत्राटदार वगळता अन्य मतदारसंघ व अन्य जिल्ह्यातील कंत्राटदारांना दिली. त्यांनी देखील कोट्यवधींचा मलिदा लाटला. पण, लहानसहान कामेही मिळाली नाहीत म्हणून दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उमेदवारांवर नाराज आहेत. प्रचारासाठी नेताजींचा फोन जाताच ‘ज्यांना कामे दिलीत, त्यांनाच प्रचाराला बोलवा’, असे स्पष्ट शब्दांत सुनावत असल्याने उमेदवारांचीही गोची होत आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. जाहीरसभा, रॅली, बैठकी आदींसाठी कार्यकर्त्यांची गर्दी हवी. उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसायला हवे. यासाठी उमेदवारांचे निकटस्थ जीवाचे रान करीत आहे. वॉर्डप्रमुख, गावप्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी येथपासून सगळेच गर्दी जमविण्याच्या मागे आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याच्या वाट्याला पद, तिकीट येत नाही. किमान लहान-मोठ्या कामांमधून उत्पन्न मिळाले तर घरही चालेल, अशी त्यांची अपेक्षा असते. असे झाल्यास पक्षाला मदत करण्याची त्यांची तयारी असते. मात्र, निवडून आल्यानंतर उमेदवाराला या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विसर पडतो. अधिक टक्केवारी देणाऱ्या कंत्राटदाराला कामे देण्यात येतात. या व्यवहारामध्ये आमदारांनाही प्रचंड कसरत करावी लागते. कार्यकर्त्यांशी व्यवहार कसा करावा, हा प्रश्न पडल्याने अन्य कंत्राटदारांनाच कंत्राट दिले जातात. त्यामुळे दुसऱ्या फळातील कार्यकर्ता मात्र हमखास दुखावला जातो. सर्वच मतदारसंघांत कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. परंतु काही महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण दिसून येते. ‘काही कार्यकर्ते तर स्पष्ट बोलत आहेत की, ज्यांना कंत्राट दिले त्यांनाच आता त्यांनाच प्रचारालाही बोलवा. यामुळे उमेदवाराला या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत असून भविष्यात भरघोस काही तरी देण्याचे आश्वासनदेखील द्यावे लागत आहे. यातून काय निष्पन्न होते, याचा अंदाज मात्र येत नाही.