शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

धामणगाव शहरवासीयांना कधी कळणार पाण्याची किंमत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:22 IST

पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदररोज दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय । दोन दिवसाआड मिळणार पाणी

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बगाजी सागर प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने शहरवासीयांना आगामी काळात दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे.सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या शहरात बाराशे कुटुंब भाड्याने राहतात. तूर्तास शहरवासीयांसाठी ८५ व्हॉल्व्हमधून दिवसाआड पाणी सोडले जाते. ज्या बगाजी सागर धरणातून शहराला पाणी मिळते. त्या धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात दोन दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे. शहरवासीयांना दरडोई ७५ लिटर पाणी मिळत असले तरी या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शहरात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहोचल्याने कूलरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे.कपडे धुवायला अधिक पाणीएखादी वस्तू मुबलक मिळाली की, त्या वस्तूची किंमत कळत नाही. पाण्याचेही तसेच. कपडे धुण्यासाठी अधिक पाणी वापरले जाते. दररोज शॉवरखाली आंघोळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही. बकेटीत पाणी घेऊन आंघोळ केली, तर १८ लिटर पाणी लागते. शॉवरखाली आंघोळ केल्यास १०० लिटर पाणी लागते. वाहत्या नळाखाली हात धुणे, शौचानंतर फ्लशचा वापर अशा सवयी लागल्या असल्याने आगामी काळात धामणगाव शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.बगाजी सागरात पाणी कमी प्रमाणातबगाजी सागर धरणात अल्प पाणीसाठा आहे.पावसाळयास सुरुवात होईपर्यंत प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले.उन्हाळ्यात धामणगाव शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, बगाजी सागर धरणातून शहराला कमी पाणीपुरवठा होतो. आगामी काळात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करावा.- सुमेध अलोनेमुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Waterपाणी