शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव शहरवासीयांना कधी कळणार पाण्याची किंमत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:22 IST

पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदररोज दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय । दोन दिवसाआड मिळणार पाणी

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बगाजी सागर प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने शहरवासीयांना आगामी काळात दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे.सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या शहरात बाराशे कुटुंब भाड्याने राहतात. तूर्तास शहरवासीयांसाठी ८५ व्हॉल्व्हमधून दिवसाआड पाणी सोडले जाते. ज्या बगाजी सागर धरणातून शहराला पाणी मिळते. त्या धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात दोन दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे. शहरवासीयांना दरडोई ७५ लिटर पाणी मिळत असले तरी या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शहरात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहोचल्याने कूलरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे.कपडे धुवायला अधिक पाणीएखादी वस्तू मुबलक मिळाली की, त्या वस्तूची किंमत कळत नाही. पाण्याचेही तसेच. कपडे धुण्यासाठी अधिक पाणी वापरले जाते. दररोज शॉवरखाली आंघोळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही. बकेटीत पाणी घेऊन आंघोळ केली, तर १८ लिटर पाणी लागते. शॉवरखाली आंघोळ केल्यास १०० लिटर पाणी लागते. वाहत्या नळाखाली हात धुणे, शौचानंतर फ्लशचा वापर अशा सवयी लागल्या असल्याने आगामी काळात धामणगाव शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.बगाजी सागरात पाणी कमी प्रमाणातबगाजी सागर धरणात अल्प पाणीसाठा आहे.पावसाळयास सुरुवात होईपर्यंत प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले.उन्हाळ्यात धामणगाव शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, बगाजी सागर धरणातून शहराला कमी पाणीपुरवठा होतो. आगामी काळात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करावा.- सुमेध अलोनेमुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Waterपाणी