शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

पांदन रस्ते चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या

अंबाडा (मोर्शी) : अंबाडा तथा परिसरातील अनेक गावातील शेतीकडे जाणारे पांदण रस्ते चिखलात गेले आहेत.पावसाळ्यात या पांदण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ती दुरवस्था शेतकऱ्यांसह मशागत करणाºया बैलजोडींसाठी जीवघेणी ठरत आहे. अनेक गावात या पांदण रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलबंडी उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन तीन वर्षांपुर्वी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजना राबविण्यात आली. येथील तथाकथित यश पाहून ती त्याच नावाने राज्यभर राबविण्याचा मानसही तत्कालिन सरकारने व्यक्त केला. मात्र जिल्हयातील पांदन रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे.ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे. या पांदन रस्त्यातील चिखलात बैलबंडी रूतत असल्याने अनेक शेतकरी डोक्यावर कापसाचे गाठोडे आणतात. मात्र तुर, सोयाबिनसाठी यंत्र वा ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागते. पांदण रस्त्यांत चिखल असल्याने तो तुडवत शेतकरी जाईल, मात्र मजूर येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मोर्शी तालुक्यातील अनेक गावात अतिशय बिकट अवस्था असताना, लोकप्रतिनिधींनी देखिल दुर्लक्ष चालविले आहे. आधीच अस्मानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने बेजार झाला आहे. त्याचेसमोर नवा प्रश्न उभा ठाकला आहे.अंबाडा ते पिपरी हा जुना वहिवाटीचा रस्ता होता. पण अतिक्रमण व काटेरी झुडपे वाढल्याने या पांदन रस्त्याने जात येत नाही. त्यामुळे पिंपरी येथील शेतकºयांना सायवाडा मार्गे जावे लागते. ४ ते ५ किमी अंतराचा फेरा मारावा लागतो.-अनिकेत पवार,शेतकरी, अंबाडाहनुमान मंदिरापासून जाणाºया रस्त्यावर चिखल असल्याने, रस्ता अरू ंद झाल्याने शेतात ये-जा करता येत नाही. ३ ते ४ किमी अंतर पायदळ जावे लागते. पिके काढण्यासाठी उदखेड मार्गाने जावे लागते. रस्ता व्यवस्था नसल्याने मजूर मिळत नाही.नारायण बोरकर,शेतकरी, अंबाडा

टॅग्स :floodपूर