शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

पांदन रस्ते चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या

अंबाडा (मोर्शी) : अंबाडा तथा परिसरातील अनेक गावातील शेतीकडे जाणारे पांदण रस्ते चिखलात गेले आहेत.पावसाळ्यात या पांदण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ती दुरवस्था शेतकऱ्यांसह मशागत करणाºया बैलजोडींसाठी जीवघेणी ठरत आहे. अनेक गावात या पांदण रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलबंडी उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन तीन वर्षांपुर्वी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजना राबविण्यात आली. येथील तथाकथित यश पाहून ती त्याच नावाने राज्यभर राबविण्याचा मानसही तत्कालिन सरकारने व्यक्त केला. मात्र जिल्हयातील पांदन रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे.ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे. या पांदन रस्त्यातील चिखलात बैलबंडी रूतत असल्याने अनेक शेतकरी डोक्यावर कापसाचे गाठोडे आणतात. मात्र तुर, सोयाबिनसाठी यंत्र वा ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागते. पांदण रस्त्यांत चिखल असल्याने तो तुडवत शेतकरी जाईल, मात्र मजूर येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मोर्शी तालुक्यातील अनेक गावात अतिशय बिकट अवस्था असताना, लोकप्रतिनिधींनी देखिल दुर्लक्ष चालविले आहे. आधीच अस्मानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने बेजार झाला आहे. त्याचेसमोर नवा प्रश्न उभा ठाकला आहे.अंबाडा ते पिपरी हा जुना वहिवाटीचा रस्ता होता. पण अतिक्रमण व काटेरी झुडपे वाढल्याने या पांदन रस्त्याने जात येत नाही. त्यामुळे पिंपरी येथील शेतकºयांना सायवाडा मार्गे जावे लागते. ४ ते ५ किमी अंतराचा फेरा मारावा लागतो.-अनिकेत पवार,शेतकरी, अंबाडाहनुमान मंदिरापासून जाणाºया रस्त्यावर चिखल असल्याने, रस्ता अरू ंद झाल्याने शेतात ये-जा करता येत नाही. ३ ते ४ किमी अंतर पायदळ जावे लागते. पिके काढण्यासाठी उदखेड मार्गाने जावे लागते. रस्ता व्यवस्था नसल्याने मजूर मिळत नाही.नारायण बोरकर,शेतकरी, अंबाडा

टॅग्स :floodपूर