शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘पेशंट रेफर टू नागपूर’ कुठवर?

By admin | Updated: December 12, 2015 00:13 IST

अपघात असो की एखादा गंभीर आजार दोन-तीन दिवसांनंतर त्या रुग्णाला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडून दिलाच जातो.

 आरोग्य सुविधांची वानवा : शासकीय रूग्णालयांमध्ये पदांचा अनुशेष अमरावती : अपघात असो की एखादा गंभीर आजार दोन-तीन दिवसांनंतर त्या रुग्णाला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडून दिलाच जातो. पेशंट ‘रेफर टू नागपूर’ असे पालुपद नेहमीच ऐकयला मिळते. त्यावरून स्मार्ट सिटीच्या शर्यतीत असलेल्या आणि अनेक व्हीव्हीआयपींच्या अमरावती शहरातील ‘आरोग्य व्यवस्था’ फारशी चांगली नसल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आता सामान्य माणसांसाठीदेखील आहे किंवा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. डफरीनमध्ये तर महिन्या-दोन महिन्यांत डॉक्टर व परिचारिकांवर दोषारोपण केले जाते. तेथे आतापर्यंत अनेक बाळ-बाळंतिणींचा मृत्यू झाला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची अवस्था फारशी चांंगली नाही. साध्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला इर्विनमध्ये दाखल केल्यानंतर तास-दोन तासांतच नागपूर किंवा खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका शासकीय स्तरावर उपलब्ध नाही. विदर्भाची उपराजधानी म्हणून शेखी मिरविणाऱ्या अमरावती शहराची एकंदरीत आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. (शासकीय रुग्णालयाकडून वेळोवेळी पदांच्या अनुशेषाचा मुद्दा समोर केला जातो. मात्र डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयांमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही. दोन-तीन दिवस उपचार केल्यानंतर येथील डॉक्टर हात टेकण्याची भाषा करून नागपूर हलविण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात. राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागड्या आरोग्य सुविधा स्वस्त दरात आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने सुरू केलेल्या शासकीय संदर्भ सेवा रूग्णालयाची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची सेवा सलाईनवर आहे. कुठल्याही परिस्थितीत प्राण वाचविणे आमचे कर्तव्य आहे. उपलब्ध साधन-सामुग्रीच्या भरवशावर जर ते शक्य होत नसेल तर संबंधित रूग्णाला इतरत्र हलविण्यात येते. त्यातही आम्ही शासकीय रूग्णालयांनाच प्राधान्य देतो. - अरूण राऊत,जिल्हा शल्य चिकित्सक