शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पटेलांनी ‘बो’म्हणताच परतले आदिवासी ! जिल्हाधिका-यांची १५ तासांची मनधरणी व्यर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 17:47 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली.

चिखलदरा (अमरावती), दि. 11 -  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, आदिवासी बधले नाहीत. मात्र,  मध्यरात्री मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये संवाद साधला आणि ‘बो’ म्हणताच दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये बसून पुनर्वसित वस्तीत परतले. यामुळे तीन दिवसांपासून तणावात असलेल्या शासकीय यंत्रणेने रविवारी रात्री १२.३० वाजता मोकळा श्वास घेतला. तालुक्यातील आठ गावांमधून पुनर्वसित झालेल्या आदिवासींना नव्या वस्तीत शासनाद्वारे कुठल्याच सोयीसुविधा न मिळाल्याने व वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मुलाबाळांसह मूळगावी कूच केले होते. हे आदिवासी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रात गेल्याने जिल्हा प्रशासनासह राज्यात खळबळ उडाली होती. 

१५ तासांची चर्चा व्यर्थ... शनिवारी खटकाली गेटचे कुलूप तोडून संतप्त आदिवासींनी कुणालाही न जुमानता आपल्या बि-हाडासह मूळ गावात येऊन बस्तान मांडले. यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्रीनिवास रेड्डी या वरिष्ठ अधिका-यांसह सर्व ताफा रविवारी सकाळी ७ वाजता जंगलाकडे निघाला. ९ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत सतत आदिवासींची मनधरणी करण्यात आली. 

राजकुमार पटेल यांची मध्यस्थी...  सतत तीन दिवसांपासून शासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव होता. वनकर्मचारी, पोलीस, कमाण्डो, दंगानियंत्रण पथक शेकडो जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, आदिवासी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव प्रवीण परदेशी यांनी हा पेच सोडविण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी दोनदा संपर्क केला. अखेरीस रात्री १२.३० वाजता राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांनी ‘बो’ (चला) उच्चारताच  ३६ तासांपासून जंगलात शिरलेले आदिवासी २८ वाहनांमधून पुनर्वसित वस्तीत परतले. 

समिती गठित, मुंबईत बैठक... पुनर्वसित आदिवासींवर अन्याय झाल्याची कबुली देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमोना, नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु. धारगड, बारूखेडा या आठ गावांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी माजी आमदार राजकुमार पटेल, आ. सुनील देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री व सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. 

कारवाई कुणावर ? चिखलदरा तालुक्यातून अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसन झाल्यावर आठ गावांतील पाच हजारांवर आदिवासींना मूलभूत सुविधा व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. यासाठी जबाबदार अधिका-यांवर कारवाईचा मुद्दा संतप्त आदिवासींनी उचलला आहे. तेव्हा प्रशासनातील अधिका-यांवर निलंबनाची कु-हाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.