शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘इथल्यापेक्षा गावाकडील पांदण रस्ते तरी बरे’

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

मागील १५ वर्षांपासून या परिसरातील मूलभूत समस्या कायम आहेत. रस्ते, नाल्या, पथदिवे, सांडपाण्याची विल्हेवाट, ....

रस्ते, नाल्या, पथदिव्यांची समस्या कायम : कैलासनगर, भाराणी लेआऊट, अंकिता लेआऊटमधील नागरिक संतप्तअमरावती : मागील १५ वर्षांपासून या परिसरातील मूलभूत समस्या कायम आहेत. रस्ते, नाल्या, पथदिवे, सांडपाण्याची विल्हेवाट, मैदान, बगिचा, रुग्णालय, शहर बस सेवा, पोलीस चौकी, नाल्यावरील पूल, जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा, यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासन, आमदार, स्थानिक नगरसेवकांशी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाच्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. अनुसूचित जातीबहुल परिसर असल्याने या भागाकडे दुर्लक्ष केले जाते, असा या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. या परिसरातून येण्यासाठी असलेला महादेव खोरी ते छत्री तलाव हा मुख्य मार्गाची मोठी दुर्दशा झालेली, रस्त्याला ठिकठिकाणी भगदाड पडली आहेत. महादेव खोरीकडून येणाऱ्या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होऊन दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी होते. पूल मंजूर आहे, असे सांगण्यात येते. मात्र अजून कामाला सुरुवात झालेली नाही. नगरसेवक केवळ भूलथापा देतात. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बहुतांश ठिकाणी रस्ते नाहीत, जिथे आहेत तिथे दुरुस्ती नाही. रस्त्याची डागडूजी वषोगिणती केली जात नाही, पावसाळ्यात मुरुम टाकला जात नसल्याने चिखलातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरापर्यंत वाहन जात नाहीत, रस्ते खराब असल्यामुळे स्कूल बसदेखील दूरवर उभ्या राहतात. तेथवर मुलांना पोहोचवून द्यावे लागते. रस्ते खराब असल्याने आॅटो या भागात फिरकत नाही. त्यामुळे या परिसरात आॅटो स्टँड व शहर बससेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बहुतेक ठिकाणी नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाण्याची डबकी ठिकठिकाणी साचली आहेत. गटार योजनेचे काम अपुरे आहेत. सफाई कामगार नियमित सेवा देत नाहीत. हायड्रोलिक आॅटो कचरा उचलण्यास येत नाही. कचऱ्याचे कंटेनर महापालिकेच्या आवारात ठेवले आहेत. पथदिवे नियमित लागत नाही. बंद पडल्यास महिनोमहिने दुरूस्त केले जात नाही. या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या प्रकाराला नागरिक त्रस्त झाले आहेत.या परिसरातील ले-आऊटमध्ये असणाऱ्या खुल्या जागेवर मैदान व बगिच्या विकसित करण्यात आलेला नाही. झाडे लावली नाहीत. मुलांना खेळायला बगिच्या नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही सुविधा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा असलेल्या या परिसरात महापालिकेची रुग्णालये नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास वडाळी रुग्णालयाशिवाय रुग्णांना पर्याय नाही. परिसरात सर्वच काटेरी झुडूपे वाढलेली आहेत. दिवसाही साप-विंचू निघतात. अंडर पाथजवळ पथदिवे नाहीत. सायंकाळी या ठिकाणी सर्रास जुगार चालतो, त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी होणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी सामूहिकरीत्या एखादा कार्यक्रम करावा, यासाठी परिसरात समाज मंदिर निर्मितीची गरज आहे. याच प्रभागातील दुसऱ्या भागात सर्व सुविधांची निर्मिती केली जात असताना या भागाकडे मात्र नगरसेवक हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात, असा या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. आम्ही करदाते आहोत. आम्हाला सुविधा द्या, अशी नागरिकांची मागणी आहे.