शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला प्रवासी, कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले.

ठळक मुद्देआर्थिक घडी रुळावर येईना : दोन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना आपत्तीत राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या एसटी बसेस सुरू झाल्या असल्या तरी बºयाच फेऱ्या तोट्यात धावत आहेत. अशातच कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाहीत. त्यामुळे एसटीला प्रवाशांची, तर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले. सध्या पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. सध्या एसटी बसेस २५ ते ३० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा एस.टी.बसेस धावत असल्या तरी प्रवासी नसल्याने फेऱ्या मर्यादेतच आहेत. वेतनाची घडी सध्या विस्कटली आहे. कोरोना आपत्तीत मार्च महिन्यात ७५ टक्के, एप्रिल महिन्यात शंभर टक्के, मे महिन्यात ५० टक्के, जून महिन्यात शंभर टक्के वेतन झाले. शासनाने केलेल्या मदतीमुळे मार्च व मे महिन्यातील उर्वरित वेतनही मिळाले. परंतु सध्या जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप वेतनाचा पत्ता नाही. एस.टी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नातून दिले जाते. परंतु सध्या उत्पन्न घटल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनस्तरावरू न मदतीचा हात मिळणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील चित्रजिल्ह्यात फेब्रुवारीत एसटी महामंडळाला सरकारी ४० लाख रुपये उत्पन्न १ लाख ४० हजार किलो मीटर अंतर कापल्यानंतर मिळत होते. ते सध्या सप्टेंबरपर्यंत ५० हजार किलोमीटर ८ आगारांतील १५० गाड्यांनी ५० हजार अंतर कापल्यानंतर १०.३० लाख मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या उत्पन्न बरेच घटल्याचे चित्र आहे.कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावणाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळालेला नाही. कोरोना बळींच्या वारसांना मदत मिळाली नाही. वेतनही नाही.- मोहित देशमुख, विभागीय सचिव

टॅग्स :state transportएसटी