भंडारज : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अकोट-अंजनगाव राष्ट्रीय महामार्गावरील भंडारज येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत निवेदन दिले.
भंडारज हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, धनवाडी, जवर्डी, धुळकी ही गावे जुळली आहेत. येथे प्रवासी निवारा उभारण्यात आला नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे तसेच गावालगतच्या रस्त्यालगत पथदिवे नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने गावात प्रवासी निवारा व पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष सागर हुरबडे, वासुदेव निचळ, चेतन गिते, गोपाल गिते, राज बैतुल, निखिल मंगळे, रवि गिते, तेजस निमकाळे, प्रज्वल मसाने यांनी केली.