शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

वरुडच्या संत्रा लिलाव मंडईत परप्रांतीय मजुरांचे लोंढे

By admin | Updated: November 28, 2015 01:04 IST

तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : बालकामगारांच्या संख्येत वाढ वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत. मजुरीला येताना मुलाबाळांसह त्यांचे आगमन होत असल्याने लहान मुलेसुध्दा अल्पशा मजुरीवर बालपण हरवून लिलाव मंडईत संत्रा चढाई-उतराईचे काम करतात. एकीकडे शासन बालकामगार ठेवण्यास मनाई करते, तर दुसरीकडे शासनाचे अधिकारी, कर्मचारी हेच बालकामगारांना काम करताना उघड्या डोळ्यांनी पाहत असते. सरकारी निमसरकारी संस्थांचे बालकामगार कायद्याला तिलांजली देत असल्याने देशाचे उद्याचे भविष्य असलेल्यांचे बालपण केव्हाचेच हरपले आहे.संत्रा आंबिया बहराची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसागणिक ३० ते ३५ ट्रक संत्रा परप्रांतात पाठविला जातो. संत्रा बागेत तोडाई आणि भराईकरिता परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर आले आहेत. महागाईमुळे दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न असल्याने गरीब मजुरांच्या नशिबी मात्र दारिद्री आहे. लहान मुला, मुलींसह वृध्द माता-पित्यांना घेऊन सर्व कुटुंब कामाच्या शोधात वरुडात दाखल झालेत. कमवा आणि शिका गरिबांच्या मुलांच्या नशिबीच असल्याने ९ ते १४ वयोगटातील खेळणे बागडण्याचे वय कामात गमावून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुटीत होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ध्यास असला तरी गरिबीने पछाडलेले असते. यामुळे शाळा संपली की ते कामाच्या शोधात असतात. परंतु यावर्षी संत्रा हंगामात मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने संत्रा भराईच्या कामात बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत मध्य प्रदेश तसे छत्तीसगढमधील परप्रांतीय आदिवासी मजूर आणि बालकामगारांची मोठी फौज आढळून येते. केवळ दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संत्र्याच्या भराईसाठी अत्यल्प मजुरीवर काम करण्यासाठी मजुरांचे लोंढे शहरात दाखल झाले आहे. उघड्यावरच सदर मजुरांचा संसार थटल्याचे चित्र बाजार समितीच्या आवारात दिसून येते. यांना राहण्याची व्यवस्था कुठेही दिसून येत नाही. एवढेच नव्हे, तर मोठे काम मिळत नसल्याने उपाहारगृहे, बसस्थानकावर गोळ्या, बिस्कीट विक्री करणे अशी कामे त्यांच्याकडून अल्प मोलमजुरीत केली जात असल्याने या दुकानदारांकडून यांना कामावर ठेवले जातात. परंतु केंद्र शासनाने बालमजुरी प्रतिबंधक कायदा केला. यामध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु कोणावरही कार्यवाही होत नसल्याने ेखुलेआम बालकामगार काम करताना आढळून येतात. केवळ दुकानदाराकडून नावापुरत्या पाट्या लावून ‘येथे बालकामगार नाहीत’ अशी सूचना स्पष्ट अक्षरात लावलेली असते. यामुळे अधिकाऱ्यांना उघड्या डोळयांनी केवळ पाटी दिसते. बालकामगार असल्यास चिरीमिरी देण्यापलीकडे काहीच होत नसल्याने सर्वांचे फावले आहे. एकीकडे शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षण विभागाची पथके पाठवून शोध घेतला जातो. परंतु बालकामगारांच्या नशिबी शिक्षण आलेच नाही. यामुळे मांजराच्या गळ्याला घंटा कोण बांधणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)