शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या संत्रा लिलाव मंडईत परप्रांतीय मजुरांचे लोंढे

By admin | Updated: November 28, 2015 01:04 IST

तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : बालकामगारांच्या संख्येत वाढ वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत. मजुरीला येताना मुलाबाळांसह त्यांचे आगमन होत असल्याने लहान मुलेसुध्दा अल्पशा मजुरीवर बालपण हरवून लिलाव मंडईत संत्रा चढाई-उतराईचे काम करतात. एकीकडे शासन बालकामगार ठेवण्यास मनाई करते, तर दुसरीकडे शासनाचे अधिकारी, कर्मचारी हेच बालकामगारांना काम करताना उघड्या डोळ्यांनी पाहत असते. सरकारी निमसरकारी संस्थांचे बालकामगार कायद्याला तिलांजली देत असल्याने देशाचे उद्याचे भविष्य असलेल्यांचे बालपण केव्हाचेच हरपले आहे.संत्रा आंबिया बहराची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसागणिक ३० ते ३५ ट्रक संत्रा परप्रांतात पाठविला जातो. संत्रा बागेत तोडाई आणि भराईकरिता परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर आले आहेत. महागाईमुळे दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न असल्याने गरीब मजुरांच्या नशिबी मात्र दारिद्री आहे. लहान मुला, मुलींसह वृध्द माता-पित्यांना घेऊन सर्व कुटुंब कामाच्या शोधात वरुडात दाखल झालेत. कमवा आणि शिका गरिबांच्या मुलांच्या नशिबीच असल्याने ९ ते १४ वयोगटातील खेळणे बागडण्याचे वय कामात गमावून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुटीत होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ध्यास असला तरी गरिबीने पछाडलेले असते. यामुळे शाळा संपली की ते कामाच्या शोधात असतात. परंतु यावर्षी संत्रा हंगामात मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने संत्रा भराईच्या कामात बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत मध्य प्रदेश तसे छत्तीसगढमधील परप्रांतीय आदिवासी मजूर आणि बालकामगारांची मोठी फौज आढळून येते. केवळ दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संत्र्याच्या भराईसाठी अत्यल्प मजुरीवर काम करण्यासाठी मजुरांचे लोंढे शहरात दाखल झाले आहे. उघड्यावरच सदर मजुरांचा संसार थटल्याचे चित्र बाजार समितीच्या आवारात दिसून येते. यांना राहण्याची व्यवस्था कुठेही दिसून येत नाही. एवढेच नव्हे, तर मोठे काम मिळत नसल्याने उपाहारगृहे, बसस्थानकावर गोळ्या, बिस्कीट विक्री करणे अशी कामे त्यांच्याकडून अल्प मोलमजुरीत केली जात असल्याने या दुकानदारांकडून यांना कामावर ठेवले जातात. परंतु केंद्र शासनाने बालमजुरी प्रतिबंधक कायदा केला. यामध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु कोणावरही कार्यवाही होत नसल्याने ेखुलेआम बालकामगार काम करताना आढळून येतात. केवळ दुकानदाराकडून नावापुरत्या पाट्या लावून ‘येथे बालकामगार नाहीत’ अशी सूचना स्पष्ट अक्षरात लावलेली असते. यामुळे अधिकाऱ्यांना उघड्या डोळयांनी केवळ पाटी दिसते. बालकामगार असल्यास चिरीमिरी देण्यापलीकडे काहीच होत नसल्याने सर्वांचे फावले आहे. एकीकडे शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षण विभागाची पथके पाठवून शोध घेतला जातो. परंतु बालकामगारांच्या नशिबी शिक्षण आलेच नाही. यामुळे मांजराच्या गळ्याला घंटा कोण बांधणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)