शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विभाजन केलेली ‘ती’ कामे रद्द

By admin | Updated: April 12, 2016 00:08 IST

शासन आदेशाला तीलांजली देत जिल्हा परिषदेच्या आठ आरोग्य व आदिवासी उपयोजना (३०-५४) या ....

सीईओंनी घेतली दखल : बैठक बोलविली अमरावती : शासन आदेशाला तीलांजली देत जिल्हा परिषदेच्या आठ आरोग्य व आदिवासी उपयोजना (३०-५४) या लेखाशीर्षातील कामांचे नियबाह्य विभाजन केल्याप्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी सुुनील पाटील यांनी लोकमतमध्ये प्रकाशित वृत्ताची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सीईओ स्वत: चौकशी करणार आहेत. तत्पूर्वी याबाबत मंगळवारी आरोग्य व बांधकाम विभागाचा आढावा घेतला जाईल.शासनाच्या आदेशानुसार तीन लाखांवरील रक्क मेची कामे ई- टेंडरिंग व्दारेच करावी, असा शासन निर्णय आहे. मात्र, जिल्हा परिषदेत या आदेशाला ‘खो’ देत सुमारे ८ कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी विभाजन करून दुरूस्ती व बांधकामे मार्गी लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. बजेटमध्ये मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत व दुरूस्तीची ‘आठ पीएच’ या लेखाशीर्षाखाली सुमारे ३.५० कोटींची कामे मंजूूर करण्यात आली, तर आदिवासी उपयोजनेतील ‘३०-५४’ या लेखाशीर्षामधून सुमारे ४ कोटी ५० लाख रूपयांची दुरूस्ती, संरक्षण भिंत बांधकाम व अन्य बांधकामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांना जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरीसुध्दा देण्यात आली आहे. शासन आदेशाची पायमल्लीअमरावती : वरील कामे ही तीन लाख रूपयापेक्षा जास्त किंमतीची असल्याने या कामासाठी ई-टेंडरिंग करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक असतानाही याला न जुमानता मार्गी एकतर्फीच मार्गी लावण्यात आलीत. केवळ ई टेंडरिग प्रक्रिया टाळण्यासाठी एकत्रित असलेले दोन्ही योजनेतील सुमारे ८ कोटी रूपयांच्या कामाचे विभाजन करण्यात आले. सदर कामांचे प्रत्येकी तीन लाख रूपयांप्रमाणे विभाजन करून यामधील काही कामांच्या वर्कआॅर्डर सुध्दा संबंधिताना देण्यात आल्या आहेत.तर उर्वरित कामाच्या वर्क आॅर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.तीन लाखा पेक्षा अधिक रक्क मेच्या कामाचे विभाजन करण्यात येवू नये, अशा शासनाच्या स्पष्ट सुचना आहे. शासन आदेशाची अवहेलनाराज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासनाच्या कुठल्याही विकास कामासह इतर कामाकरिता तीन खालावरील कामासाठी निविदा (ई-टेंडरिंग) करणे बंधनकारक केले आहे. कुठल्याची कामाचे विभाजन करूण कामे करण्यात येवू नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे. आठ आरोग्य आणि आदिवासी उपयोजना ३०-५४ लेखाशीर्षातील ज्या कामांचे विभाजन करण्यात आले. अशी सर्व चुकीचे कामे आढावा व चौकशी करून रद्द केली जातील.शासन आदेशानुसारच कामे होणे अपेक्षित आहे. त्याच प्रमाणे कामे केली जातील- सुनील पाटील, सीईओ, जिल्हा परिषद