शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

चार तालुक्यात भूजलस्थितीत अंशत: कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने पुनर्भरण झाल्यामुळे भूजलस्तरात वाढ झालेली होती. यंदा जून महिन्यात चार तालुक्यातील भूजलस्थितीत ...

अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने पुनर्भरण झाल्यामुळे भूजलस्तरात वाढ झालेली होती. यंदा जून महिन्यात चार तालुक्यातील भूजलस्थितीत अंशत: घट झाली असली तरी दहा तालुक्यातील भूजलात सरासरी पातळीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. भूजल सर्व्हेक्षण (जीएसडीए) विभागाद्वारा जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीच्या आधारे हे निरीक्षण नोंदविले आहे.

मागच्या वर्षी ८२९.९० मिमी म्हणजेच ९६.१८ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर परतीचा पाऊस व डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरूच होता. यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले होते. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसायला लागला आहे. यंदा मार्चपर्यंत सर्वच तालुक्याच्या भूजलात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. ‘जीएसडीए’द्वारा पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या आधारे निरीक्षण नोंदविले. जून महिन्यात मात्र, तिवसा चांदूर बाजार, अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील भूजलात अंशत: कमी आलेली आहे.

भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या नोंदीनुसार सद्यस्थितीत अमरावती तालुक्यात सरासरी भूजल पातळीच्या ०.०१ मीटर जास्त, भातकुली ०.२६, नांदगाव खंडेश्वर १.२२, चांदूर रेल्वे ०.९७, मोर्शी१.८५, वरुड १.३८, अचलपूर ०.३३, धारणी १.४०, चिखलदरा १.०१, व धामणगाव तालुक्यात ०.६८ मीटरने भूजलातील पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे व पाच वर्षात यंदा प्रथमच भूजलासाठी सकारात्मक चित्र नोंदविले आहे.

बॉक्स

रेड झोनमधील भूजलात वाढ

भूजलाचा वारेमाप उपसा झाल्यामुळे रेड झोनमध्ये आलेल्या मोर्शी व वरूड तालुक्यात यंदा सुखद चित्र आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १.८५ व १.३८ मि.मी वाढ झालेली आहे. भूजलाचे झालेले पुनर्भरण, जलसंधारणाची कामे व अनधिकृत बोअरला प्रतिबंध केल्यामुळे या तालुक्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.

बॉक्स

खारपाणपट्टा भूजलातील घट चिंताजनक

जिल्ह्यात खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या तालुक्यातील भूजलात यंदा घट झालेली आहे. या तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे भूजलाचा उपसा झालेला तरीही जिल्ह्यात सर्वात जास्त दर्यापूर तालुक्यात २.१२ मी. व अंजनगाव तालुक्यात ०.७० मी भूजलात आलेली तूट चिंताजनक आहे. याशिवाय भातकुली तालुक्यात मात्र ०.२६ मी. वाढ झालेली आहे.