शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

महामार्गाचे काठ बनले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST

अपघाताला आमंत्रण : पोलिसांचे दुर्लक्ष चांदूर बाजार : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ट्रक तसेच अन्य वाहनचालक वाहने उभी ...

अपघाताला आमंत्रण : पोलिसांचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ट्रक तसेच अन्य वाहनचालक वाहने उभी करीत असल्याने हा महामार्ग अरुंद झाला आहे. परिणामी, अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. या प्रकारामुळे महामार्ग जणू वाहनतळ बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सुरक्षित रस्ते निर्मितीवर सध्या शासनाचा भर आहे. याच मालिकेत यात शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. सदर मार्ग हा मध्यप्रदेशला जोडला जात असल्याने या मार्गावर रात्रंदिवस जड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर अनेकांनी रस्त्याच्या कडेलाच वाहन दुरुस्तीची दुकाने थाटली आहेत.

शहरालगत असलेल्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने लोखंडी कठडे लावले आहे. या कठड्यांना लागूनच अनेकांनी दुकाने उभारल्याने ट्रक, ट्रॅक्टर, अनेक लहान मोठे वाहनचालक वाहन दुरुस्तीकरिता मार्गावरच थांबतात. यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यातच झपाट्याने अतिक्रमण वाढत असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपी गेले असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.

महामार्गावर थाटली दुकाने

चांदूर बाजार, शिराजगाव बंड, जमापूर या भागात राष्ट्रीय महामार्गावर उघड्यावरच मटण विक्री, गाड्या दुरुस्तीचे गॅरेज, फळ विक्रीची दुकाने उभारली आहे. सर्वाधिक दुकाने गाड्या दुरुस्तीची असल्याने मोठमोठे वाहने मुख्य रस्त्यावरच उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग प्राधिकरण व्यवस्थापन व महामार्ग पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.