शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

वाढीव शिक्षण शुल्काने पालकांच्या खिशाला कात्री

By admin | Updated: July 9, 2014 23:13 IST

शिक्षण संस्थेला आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरवापर करुन महाविद्यालय शिक्षण शुल्काच्या संदर्भात मनमानी धोरण राबवून विद्यार्थी

सुरेश सवळे - चांदूरबाजारशिक्षण संस्थेला आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरवापर करुन महाविद्यालय शिक्षण शुल्काच्या संदर्भात मनमानी धोरण राबवून विद्यार्थी व पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचा अनुभव विद्यार्थी घेत आहेत. महाविद्यालयांमध्ये आकारले जाणारे शिक्षण शुल्क कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहेत ते लपविण्याचाही डाव महाविद्यालयांव्दारे आखले जात आहे. शिक्षण संस्थांनी ज्ञान दानाच्या नावाखाली चालविलेल्या या नफाखोरीच्या व्यवसायाला रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना निकष तपासण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहे. मात्र या अधिकारांचा वापर केला जात नाही अथवा वापर करु दिला जात नाही. शिक्षण शुल्क समितीच्या २१ एप्रिल २०१४ रोजी निवृत्त न्यायाधीश पी.एस. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षण शुल्क समितीने शिक्षण शुल्क ठरविण्याचे निकष विशद केले आहेत. हे निकष समितीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या समितीने ठरवून दिलेले शुल्क संबंधित संस्थांवर बंधनकारक असले तरी महाविद्यालय खोटे दस्तऐवज व खोटे लेखा परीक्षण अहवाल आॅडिट जोडून भरमसाठ शुल्क उकळतात. ही पालकांची, विद्यार्थ्यांची व पर्यायाने शासनाची फसवणूक असल्याचा आरोप त्रस्त पालकांनी केला आहे.शिक्षण समितीला महाविद्यालयाकडून होणाऱ्या त्रृटीची जाण असतानासुध्दा समितीकडून अशा महाविद्यालयांविरुध्द कोणतीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे महाविद्यालयांची मनमानी, शिक्षण शुल्क आकारण्याची एकाधिकाराशाही सुरुच आहे.प्रत्येक महाविद्यालयाने शिक्षण शुल्कासाठी जो प्रस्ताव शिक्षण शुल्क समितीकडे पाठविला आहे तो प्रस्ताव सर्व पालक, व विद्यार्थ्यांकरिता माहितीस उपलब्ध व्हावा यासाठी तसेच महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डावरसुध्दा लावण्यात यावा, असे बंधनकारक आहे. याचे पालन झाले नाही तर शिक्षण शुल्काची रक्कम २० टक्के, तर प्रस्ताव खोटा अथवा बनावट असल्याचे सिध्द झाल्यास ही रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. असे असताना यातील एकाही नियमांचे पालन महाविद्यालयांकडून होताना दिसत नाही. कारण महाविद्यालयांनी शिक्षण शुल्क समितीकडे पाठविलेले प्रस्तावाचे दस्तऐवजच मुळात खोटा व बनावट असतात. राज्यातील अशाच एका महाविद्यालयाचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणात न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले व तोपर्यंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु आदेशाचे उल्लंघन होतांना दिसत आहे. वाढीव शिक्षण शुल्काने मात्र पालकांच्या खिशाला कात्री लावली.