शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव शिक्षण शुल्काने पालकांच्या खिशाला कात्री

By admin | Updated: July 9, 2014 23:13 IST

शिक्षण संस्थेला आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरवापर करुन महाविद्यालय शिक्षण शुल्काच्या संदर्भात मनमानी धोरण राबवून विद्यार्थी

सुरेश सवळे - चांदूरबाजारशिक्षण संस्थेला आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरवापर करुन महाविद्यालय शिक्षण शुल्काच्या संदर्भात मनमानी धोरण राबवून विद्यार्थी व पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचा अनुभव विद्यार्थी घेत आहेत. महाविद्यालयांमध्ये आकारले जाणारे शिक्षण शुल्क कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहेत ते लपविण्याचाही डाव महाविद्यालयांव्दारे आखले जात आहे. शिक्षण संस्थांनी ज्ञान दानाच्या नावाखाली चालविलेल्या या नफाखोरीच्या व्यवसायाला रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना निकष तपासण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहे. मात्र या अधिकारांचा वापर केला जात नाही अथवा वापर करु दिला जात नाही. शिक्षण शुल्क समितीच्या २१ एप्रिल २०१४ रोजी निवृत्त न्यायाधीश पी.एस. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षण शुल्क समितीने शिक्षण शुल्क ठरविण्याचे निकष विशद केले आहेत. हे निकष समितीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या समितीने ठरवून दिलेले शुल्क संबंधित संस्थांवर बंधनकारक असले तरी महाविद्यालय खोटे दस्तऐवज व खोटे लेखा परीक्षण अहवाल आॅडिट जोडून भरमसाठ शुल्क उकळतात. ही पालकांची, विद्यार्थ्यांची व पर्यायाने शासनाची फसवणूक असल्याचा आरोप त्रस्त पालकांनी केला आहे.शिक्षण समितीला महाविद्यालयाकडून होणाऱ्या त्रृटीची जाण असतानासुध्दा समितीकडून अशा महाविद्यालयांविरुध्द कोणतीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे महाविद्यालयांची मनमानी, शिक्षण शुल्क आकारण्याची एकाधिकाराशाही सुरुच आहे.प्रत्येक महाविद्यालयाने शिक्षण शुल्कासाठी जो प्रस्ताव शिक्षण शुल्क समितीकडे पाठविला आहे तो प्रस्ताव सर्व पालक, व विद्यार्थ्यांकरिता माहितीस उपलब्ध व्हावा यासाठी तसेच महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डावरसुध्दा लावण्यात यावा, असे बंधनकारक आहे. याचे पालन झाले नाही तर शिक्षण शुल्काची रक्कम २० टक्के, तर प्रस्ताव खोटा अथवा बनावट असल्याचे सिध्द झाल्यास ही रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. असे असताना यातील एकाही नियमांचे पालन महाविद्यालयांकडून होताना दिसत नाही. कारण महाविद्यालयांनी शिक्षण शुल्क समितीकडे पाठविलेले प्रस्तावाचे दस्तऐवजच मुळात खोटा व बनावट असतात. राज्यातील अशाच एका महाविद्यालयाचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणात न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले व तोपर्यंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु आदेशाचे उल्लंघन होतांना दिसत आहे. वाढीव शिक्षण शुल्काने मात्र पालकांच्या खिशाला कात्री लावली.