शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विदर्भातील संत्रा उत्पादकांची परवड

By admin | Updated: December 12, 2015 00:17 IST

वरुड-मोर्शी तालुक्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन केला जातो. योग्य भावानुसार या व्यवसायात ९०० कोटी रुपयांची उलाढाल होते.

संत्र्याची मातीमोल कहाणी : मोर्शी-वरुड तालुक्यात ९०० कोटींची उलाढाल संजय खासबागे वरुडवरुड-मोर्शी तालुक्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन केला जातो. योग्य भावानुसार या व्यवसायात ९०० कोटी रुपयांची उलाढाल होते. परंतु भाव कमी मिळत असल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. संत्र्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने अमरावती जिल्ह्यात उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे. राज्यात केवळ विदर्र्भात संत्राबागा आहेत. यामध्ये एक लाख २६ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा पीक घेतले जाते. जिल्ह्यात संत्राचे ७० हजार हेक्टर क्षेत्र आहे असून वरुड मोर्शी तालुक्यात ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेतले जाते. वरुड तालुका संत्र्यासाठी प्रसिध्द आहे. संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्कयापेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरवर्षी मृग बहराची संत्रा उत्पादन घेतले जात होते. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरामध्ये कमालीची घसरण केली. साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून विकला जाणारा संत्राची पध्दत बंद होऊून थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्राफळामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरित परिणाम झाला आहे.परप्रांतीय बाजारपेठेत संत्रा विक्री केंद्राची मागणीशासनाने संत्राकरीता कोणतेही असे ठोस पाउल उचलले नाही. एवढेच नव्हे तर संत्रा दिल्ली, पंजाब, मुंबई, कलकत्ता, विजयवाडासह आदी परप्रांतीय बाजारपेठेत पाठविला जात असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगलीच पिळवणूक होते. दुपट्टा प्रकारात खरेदी विक्री होत असल्याने आंधळा व्यवहार होतो. नेमकी यातच फसगत होते. परंतु संत्र्याकरिता बाजारपेठ असली तर संत्र्याला सुगीचे दिवस येतील. अन्याय संत्रा उत्पादनाला अखेरची घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. राज्यात तसेच परप्रांतीय बाजारपेठेमध्ये संत्राविक्री केंद्र राज्यसरकारने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ७० वर्षांच्या उत्पादनाला खीळ बसण्याची शक्यता उत्तर भारतात संत्र्याचे महत्त्व कमी झाले. वातावरणीय बदलानुसार भाव मिळत नाही. बााजरपेठेत स्थिरता नसल्याने ७० वर्षांची परंपरा असलेल्या संत्राला उत्पादनाला अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या परिसराचे वैभव असलेल्या संत्रा उत्पादनाला खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेकांनी संत्राबागा तोडून डाळिंबाच्या बागा लावल्यात, हे विशेष.संत्रा विक्रीच्या वेळी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दलालांना दोन टक्के कमीशन द्यावे लागते. व्यापाऱ्यांकडूनही एक टक्का मिळतो. या व्यवहारात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासनाने थेट मार्केटिंग केल्यास संत्र्याला भाव मिळेल. मात्र नागपुरी संत्रा म्हटले जाणाऱ्या नागपुरात केवळ ४ ते ५ मॉल आहेत.- रमेश जिचकार, सचिव, महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक महासंघ.