शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटरवर पाणवठे

By admin | Updated: March 2, 2017 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

वन्यजीवांची सुरक्षितता : जंगलात पाण्यासाठी भटकंती नाहीअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी व्याघ्र प्रकल्पात सुरु झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागात नैसर्गिक व कृत्रिम असे ९६० पाणवठे आहेत. मात्र, वन्यजीवांची वाढत चाललेली संख्या बघता हे पाणवठे कमी पडू लागले आहेत. मेळघाटात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अत्यल्प आहेत. त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांच्या शिकारी अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षकांना दर दोन किलोमीटरच्या आत एक पाणवठा निर्माण करण्याच्या सूचना क्षेत्र संचालकांनी दिल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले जाणार आहेत. १५ मार्चपर्यत वन्यजीवांसाठी पाणवठे सज्ज राहतील, असा दावा व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.१५ दिवसांत पाणवठे तयारअमरावती : जेमतेम मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार, असे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल, मे व जून महिन्यात जंगलात पाणीसमस्या उद्भवणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. तसेच जंगलात आग लागू नये, यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविला जात आहे. यापूर्वी मेळघाटात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेत व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी आग रोखण्यासाठी संयंत्रे, अद्ययावत साहित्य, पुरेसे मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे. व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सर्वाधिक नैसर्गिक पाणवठे तयार करण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)मेळघाटात हे आहेत वन्यपशूमेळघाट व्याघ्र प्रकल्प वनसंपदेने नटलेला आहे. वन्यपशू, सरपटणारे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यात वाघ, बिबट, हरिण, काळवीट, तडस, खवल्या मांजर, सायाळ, रानकुत्रे, सांबर, रानडुक्कर, शेवशिंगा, लांडगा, नीलगाय, अस्वल, भेडकी, गव्हा, लाल तोंडाचे माकड, चितळ, रानमांजर आदींचा समावेश आहे. इतरही अनेक पशू या जंगलात मुक्तसंचार करतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत यावेळी उन्हाळ्यात वन्यपशू, प्राण्यांना पाणीटंचाई भासणार नाही. मागील आठवड्यातील बैठकीत हा मुद्दा आवर्जुन हाताळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सूचना दिल्या असून १५ दिवसांत पाणवठे तयार होतील.- एम.एस.रेड्डीक्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प