शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटरवर पाणवठे

By admin | Updated: March 2, 2017 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

वन्यजीवांची सुरक्षितता : जंगलात पाण्यासाठी भटकंती नाहीअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी व्याघ्र प्रकल्पात सुरु झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागात नैसर्गिक व कृत्रिम असे ९६० पाणवठे आहेत. मात्र, वन्यजीवांची वाढत चाललेली संख्या बघता हे पाणवठे कमी पडू लागले आहेत. मेळघाटात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अत्यल्प आहेत. त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांच्या शिकारी अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षकांना दर दोन किलोमीटरच्या आत एक पाणवठा निर्माण करण्याच्या सूचना क्षेत्र संचालकांनी दिल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले जाणार आहेत. १५ मार्चपर्यत वन्यजीवांसाठी पाणवठे सज्ज राहतील, असा दावा व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.१५ दिवसांत पाणवठे तयारअमरावती : जेमतेम मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार, असे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल, मे व जून महिन्यात जंगलात पाणीसमस्या उद्भवणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. तसेच जंगलात आग लागू नये, यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविला जात आहे. यापूर्वी मेळघाटात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेत व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी आग रोखण्यासाठी संयंत्रे, अद्ययावत साहित्य, पुरेसे मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे. व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सर्वाधिक नैसर्गिक पाणवठे तयार करण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)मेळघाटात हे आहेत वन्यपशूमेळघाट व्याघ्र प्रकल्प वनसंपदेने नटलेला आहे. वन्यपशू, सरपटणारे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यात वाघ, बिबट, हरिण, काळवीट, तडस, खवल्या मांजर, सायाळ, रानकुत्रे, सांबर, रानडुक्कर, शेवशिंगा, लांडगा, नीलगाय, अस्वल, भेडकी, गव्हा, लाल तोंडाचे माकड, चितळ, रानमांजर आदींचा समावेश आहे. इतरही अनेक पशू या जंगलात मुक्तसंचार करतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत यावेळी उन्हाळ्यात वन्यपशू, प्राण्यांना पाणीटंचाई भासणार नाही. मागील आठवड्यातील बैठकीत हा मुद्दा आवर्जुन हाताळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सूचना दिल्या असून १५ दिवसांत पाणवठे तयार होतील.- एम.एस.रेड्डीक्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प