शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गीत-संगीतात रंगली 'पाडवा पहाट'

By admin | Updated: March 22, 2015 01:26 IST

पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मानवी नात्यांची वीण सैल होत चालली आहे.

अमरावती : पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मानवी नात्यांची वीण सैल होत चालली आहे. मानवी नातेसंबंध जपणारी आपली भारतीय संस्कृती आहे. नात्यांचे सैल होत जाणारे भावबंध जपण्याचा संदेश संस्कार भारतीच्यावतीने आयोजित पाडवा पहाट सोहळ्यातून देण्यात आला.मागील १५ वर्षांपासून अमरावतीकरांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या ‘पाडवा पहाट’ उपक्रमाला अमरावतीकर रसिकांनी यंदाही अपार गर्दी केली होती. नेत्रदीपक आतषबाजी, भव्य रंगमंच व सुमारे शंभराहून अधिक कलाकारांच्या सामूहिक कलाविष्काराने नववर्षाची पहिली पहाट स्थानिक व्यंकटेश लॉनच्या मंचावर उगवली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा, सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, भाजपाचे विभागीय संघटनमंत्री रामदास आंबटकर, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण धांदे, विधिज्ञ प्रवीण मालू, सूरमणी प्रा. कमल भोंडे, प्रांत संघटनमंत्री अजय देशपांडे, मोहन काटे यांच्यासह अमरावती शाखेच्या अध्यक्ष जयश्री वैष्णव यांच्या उपस्थितीत गुढीचे पूजन करण्यात आले. ‘मानवी नाते-काल आणि आज ’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम रंगला. तरुण व नव्या दमाच्या कलाकारांनी एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण केले. मोहन बोडे यांच्या मार्गदर्शनात शीतल मेटकर, सुरभी बोडे, प्रकाश मेश्राम, हर्षदा पातुरकर आणि रसिका वडवेकर- वानखडे यांनी विविध नृत्यांचे दिग्दर्शन केले. अश्विनी पारळकर यांच्या मार्गदर्शनात प्रसाद खरे यांनी नाट्यछटा सादर केली. ‘कुंजवनातील सुंदर राणी’ या चित्रपट गीतातून मानवी नात्यांची रूपे काळानुसार कशी बदलत गेली, हे दर्शविले. नंतर ‘मेरी माँ’ या व ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ या गीतांवर अनुक्रमे आई व बाबांचे नाते सादर केले गेले. आपल्या जीवनातील आई-बाबांच्या स्थानाविषयीची काही हळुवार दृश्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मनोहरराव कवीश्वर यांच्या ‘गीत गोविंद’मधील ‘चिंधी’ गीतातून द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या नात्याचे भावबंध उलगडले. ‘जीवन आपुले सार्थ करा रे’ या गीतातून छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी यांचे शौर्य व लोकमान्य टिळक यांचे दर्शन प्रेक्षकांना घडून आले. ‘नात्याला काही नाव नसावे’ यातूनही मानवी नात्यांमधला हळुवारपणा प्रगट झाला. ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या गीतावर वरदा पाठक व गायत्री खरे यांनी केलेली झुकझुक गाडी व इतर रेखाटने आकर्षणाचे केंद्र ठरली. शिवराय कुळकर्णी व अश्विनी पारळकर यांच्या संवादात्मक निवेदनातून कथासूत्र समोर सरकत गेले. जयश्री वैष्णव, आल्हाद व आलोक आळशी, स्वागता पोतनीस, आशुतोष देशपांडे यांच्यासह मयूर जोशी, अंबिका ठाकरे, मुकुंद सूर्यवंशी, शुभम पांडे, अभिराम लोमटे, केतकी मोहदरकर, यांनी गायन व समूह स्वरात भाग घेतला. गायकांना प्रशांत अग्निहोत्री (बासरी), श्रेयस वैष्णव (सिंथेसायझर), प्रसाद पांडे, स्वप्नील सरपोतदार (तबला), अभिजीत भावे (गिटार),सुभाष वानखडे (आॅक्टोप्याड) यांनी साथसंगत केली.