शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

वाहून गेलेल्या युवकांच्या घरी आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पेटल्या नाही चुली : संतोष, सागरचा मृतदेह सापडला

सचिन मानकर/धीरज राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वाठोडा शुक्लेश्वर येथे गेलेले चौघे पूर्णामायच्या प्रवाहात वाहून गेल्याचे वृत्त धडकल्यापासून तालुक्यातील गौरखेडा येथील वॉर्ड १ मध्ये शोककळा पसरली आहे. दुसºया दिवशी शुक्रवारी गावात चुली पेटल्या नाहीत. वाहून गेलेल्या चौघांपैकी दोन विद्यार्थी होते. पुतण्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेणारा काकादेखील वाहून गेला.गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. वाहून गेलेले उर्वरित दोघे जिवंत असावे, अशी मनोमन प्रार्थना प्रत्येक गावकरी करीत आहे. मात्र, पूर्णा नदीचे पात्र फुगल्याने ही शक्यता कमीच आहे. प्रवाहाचा शोधमोहिमेतही अडथळा झाला आहे.प्रथम सापडला संतोषचा मृतदेहसंतोष वानखडे (४५) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी जिल्हा शोध व बचाव पथक आणि पोलिसांनी शुक्लेश्वर घाटावरून पात्राबाहेर काढला. पुतण्या ऋषीकेशला वाचविण्यासाठी त्यांनी नदीपात्रात उडी घेतली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. आई, पत्नी, ११ वर्षांचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी असे कुटुंबीय त्यांच्या पश्चात आहेत.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू