शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोविडबाह्य रुग्णसेवा केंद्रे सुरू व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

अमरावती : सौम्य लक्षणांच्या भीतीतून लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. अशा रुग्णांसाठी शहरात कोविडबाह्य रुग्णसेवा केंद्रांची नितांत ...

अमरावती : सौम्य लक्षणांच्या भीतीतून लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. अशा रुग्णांसाठी शहरात कोविडबाह्य रुग्णसेवा केंद्रांची नितांत आवश्यकता असून, त्यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी माजी आमदार सुनील देशमुख व भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संयुक्त पत्रपरिषदेतून केली.

सध्याच्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गात वाढ झाली असून, लोकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येताच सौम्य लक्षणे असलेले लोकही पुढच्या दोन-चार दिवसांत प्रकृती ढासळू नये म्हणून स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अतिशय आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांना बेड उपलब्ध राहत नाहीत. अशावेळी होम क्वारंटाईन असलेल्या असंख्य रुग्णांच्या मनात भीती निर्माण झाली किंवा थोडा त्रास वाढला, तर त्याने कुठे धाव घ्यावी, ही गंभीर समस्या बनलेली आहे. कोविड रुग्णालयांशिवाय सौम्य लक्षणे असलेल्या, होम क्वारांटाईन असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक शहरात विविध भागात कोविड ओपीडी सुरू झाल्यास रुग्णांच्या मनात असलेली भीती दूर होईल. कोविडवर उपचार करणारा डॉक्टर आपल्यासाठी उपलब्ध आहे, हा विश्वास निर्माण होईल. परिणामी चाचणी टाळणारे लोकदेखील चाचणी करून घेतील आणि संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल, असे देशमुख आणि कुळकर्णी म्हणाले.

पत्रपरिषदेला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र खांडेकर, शहर सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे उपस्थित होते.