शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Coronavirus positive story; अमरावती जिल्ह्यात १,५६१ गावांपैकी २७७ गावांनी वेशीवर रोखला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 09:20 IST

Amravati news अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे. अशा भयावह परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण १,५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्यापपर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही.

ठळक मुद्देसीईओंच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे. अशा भयावह परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण १,५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्यापपर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही. गत वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून १६ मे २०२१ पर्यंत ही गावे कोरोनाविहीन ठरली आहेत.

कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या या गावात यापुढे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृृती करावी, असे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतलेल्या बैठकीत दिलेत.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाच शिरकाव झाला आहे. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. गत मार्च २०२० मध्ये कोरोना संकटाला सुरुवात झाली. पण ३ एप्रिल २०२० पर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता. ४ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यांतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. जिल्ह्यातील १५६१ गावांपैकी २७७ गावांनी कोरानाला वेशीवर रोखले आहे. या गावात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे या कोरोना मुक्त असलेल्या गावात यापुढे कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता विशेष खबरदारी घेण्यासाठी गावात जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी. तसेच अन्य उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत: या गावांकडे लक्ष देऊन गावे कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायतींही खबरदारी ठेवण्याचे निर्देश सीईओंनी दिले.

सीईओ देणार गावांना भेटी

सध्या कोरोनाचा संसर्गापासून दूर असलेल्या जिल्ह्यातील २७७ गावांत अद्याप कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे यापुढे ही गावे कोरोनामुक्त राहावी, याकरिता आवश्यक खबरदारीचे निर्देश सीईओंना दिले आहेत. सीईओंच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणीही होत आहे की, नाही याची प्रत्यक्ष शहानिशा झेडपीचे सीईओ प्रत्यक्ष कोरोना मुक्त गावांना भेटी देणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्याप कोरोना बाधित रुग्ण आढळलेले नाहीत. यापुढेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता जनजागृतीसह अन्य उपाययोजनांचे निर्देश बीडीओंना सोमवारी दिलेत. या गावांना मी स्वत:ही भेटी देणार आहे.

- अविश्यांत पंडा,

मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या