शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

-तर मंत्र्यांच्या घरात तूर भरणार

By admin | Updated: April 25, 2017 00:04 IST

तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांची थट्टा व व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करीत आहे. शासनाने बंद केलेली तूर खरेदी तातडीने सुरू करावी, ..

बच्चू कडू : बाजार समितीत धडक, शेतकऱ्यांशी संवादपरतवाडा : तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांची थट्टा व व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करीत आहे. शासनाने बंद केलेली तूर खरेदी तातडीने सुरू करावी, अन्यथा थेट मंत्र्यांच्या घरात तुरीचे पोत्यांची साठवणूक केली जाईल, असा इशारा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. यामुळे बाजार समिती प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. तूर खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे, अशी तक्रार आ. कडू यांच्याकडे करण्यात आली. -तर संबंधितांना जाब विचारूपरतवाडा : शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर त्यांनी थेट अचलपूर बाजार समितीकडे मोर्चा वळविला. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार राजेंद्र करडे व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बाजार समिती यार्डात बोलावून घेतले. तूर खरेदी का बंद करण्यात आली याचा जाब त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान त्यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नाफेडची तूर खरेदी सुरू करावी व न्याय मिळवून द्यावा अन्यथा तुमच्या घरात तूर साठवून ठेवू, असा इशारा देण्यात आला. विदेशातून तूर आयात करणारे हे शासन शेतकऱ्यांची तूर विकत घेत नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी गजानन भोरे, अंकुश गायकवाड, मंगेश हुड, श्याम मालू, सतीश व्यास, दीपक भोटे आदी उपस्थित होते.चांदुरात बच्चू कडू आक्रमकचांदूरबाजार : येथील बाजार समितीत आधीच शेतकऱ्यांचे २१ हजार क्विंटल तूर शिल्लक असताना वरुड येथून नाफेडने १३ ट्रक तूर गोदामात ठेवण्यासाठी पाठविली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची विक्रीसाठी आलेली तूर आधीच उघड्यावर असताना बाहेरून आलेली तूर खाली करू देणार नाही, अशी संतप्त भूमिका आ. बच्चू कडू यांनी घेतली आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये अद्यापपर्यंत ४४ हजार ६३८ पोते तूर विक्रीसाठी आणली. त्यात २२ एप्रिलपर्यंत १०२२ शेतकऱ्यांचे २१ हजार ६१४ क्विंटल तुरीचे मोजमाप पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित हजारो क्विंटल तुरीचे मोजमाप होणेच बाकी असून, ही तूर ठेवण्याकरिता गोदामच शिल्लक नाहीत. अशी भयावह स्थिती असताना नाफेडच्या वरूड येथील अधिकाऱ्यांनी खरेदी केलेली तूर ठेवण्याकरिता १३ ट्रक भरून चांदूरबाजार येथे पाठविली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांची तूर उघड्यावर पडली असताना वरूडहून आलेली तूर खाली करू नये, अशी सूचना बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख यांनी ट्रकचालकांना केली. सदर प्रकरण आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिले. माहिती मिळताच आ.बच्चू कडू, तहसीलदार शिल्पा बोबडेंसह बाजार समितीत दाखल झाले. शेडमध्ये व्यापाऱ्यांचे शेकडो क्विंटलमाल आहे. शेतकऱ्यांची न मोजलेली तूर उघड्यावर आहे. नाफेडतर्फे खरेदी बंद आहे. यावर आ. बच्चू कडू यांनी सचिव मनीष भारंबे यांना व्यापाऱ्यांची तूरशेडमधून तत्काळ उचला, अन्यथा पेटवून देऊ, अशी तंबी दिली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तूर खरेदी सुरू करण्याबाबत चर्चा केली व वरूडहून आलेल्या सर्व माल परत पाठविला. शासनाच्या आश्वासना प्रमाणे तुरीच्या अखेरच्या दाण्यापर्यंत खरेदी करावे, अन्यथा आम्ही मंत्र्यांच्या घरात तूर भरू. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्यास संबंधिताना जाब विचारू.- बच्चू कडू, आमदार