शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा महोत्सवाचे आयोजन राज्याच्या कानाकोप-यात व्हावे- सुभाष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:51 IST

वरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील.

- संजय खासबागेवरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील. या आयोजनासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.वरूड येथे आयोजित कृषी विकास परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बोंडे, मुलताईचे(म.प्र.) आमदार चंद्रशेखर देशमुख, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे, जि.प.सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, कमलाकर देशमुख, सैयद सलीम अहमद, योगेश थोरात उपस्थित होते. कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीच्या समस्या समजून घेऊन किमान एक वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन ना. देशमुख यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात आ. बोंडे म्हणाले, चार भिंतीच्या आड लपलेले तंत्रज्ञान शेतक-यांना मिळण्यासाठी कृषी विकास परिषदेचे आयोजन आहे. यातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. शेतक-यांना वीज मिळावी, यासाठी गव्हानकुंड येथे २५ मेगावॅटचा वीजप्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या कृषी विकास परिषदेला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला.