शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

अमरावतीत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जनजागृती, मार्गदर्शन वर्गाचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 16:12 IST

 मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

अमरावती-  मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच आपल्या बाह्य अवयवात होणारा बदल पाहून घाबरून न जाता मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या आईला, बहिणीला किंवा आपल्या शिक्षिकेंना विचारावे. मासिक पाळी येणे ही स्त्रीत्वाची निशाणी आहे. ती नैसर्गिक गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका ज्योत्स्ना शेटे यांनी केले. 

भातकुली पंचायत समितीच्या पूर्व माध्यमिक शाळा दाढी येथे विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळीत घ्यावयाची काळजी’ यावर उद्बोधन वर्ग घेण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मार्गदर्शन करीत होत्या. ज्योत्स्ना शेटे म्हणाल्या, मुलींचा जन्म फक्त चूल व मूल यापुरताच मर्यादित नाही. तुम्हाला खूप शिकून आपल्या पायावर उभे राहायचे आहे. तेव्हा शारीरिक मजबुतीसोबत मानसिक ताकद किती आवश्यक आहे, तेही समजावून घेतले पाहिजे. स्वत:चे रक्षण वाईट प्रवृत्तीपासून कसे करावे, याबद्दलही ज्योत्स्ना शेटे यांनी माहिती दिली. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका ज्योती गायकी, पुष्पलता वसुकर, सुरेखा अटाळकर यांनी मुलींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते समजावून सांगितले. उपस्थितांचे आभार ज्योती गायकी यांनी मानले.

शिक्षिका म्हणाल्या, आम्ही तुमच्या मैत्रिणीच यावेळी मुलींना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करून त्याचा वापर कसा केला पाहिजे, ते समजावून सांगितले. ज्योती गायकी, अटाळकर यांनी शारीरिक व मानसिक बदल याची माहिती चर्चेद्वारे समाजवून दिली. आम्ही तुमच्या मैत्रिणी आहोत, असे शिक्षिकांनी सांगताच मुलींना आनंद झाला. अन् अनेक समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले. यामुळे मुलींच्या मनावर असलेले दडपण कमी झाल्याचे समाधान झळकत होते.