शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी केली.

ठळक मुद्देपालकमंत्री : मेळघाटातील बोरी येथे ‘सरप्राईज व्हिजिट’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी केली. त्यांनी अंगणवाडीची तपासणीही केली. मुलांचा आहार तपासला आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भारती ठाकरे ही आठवीतील विद्यार्थिनी हृदयरुग्ण असून, तिच्या उपचारांसाठी कागदपत्रे दाखल करूनही अद्याप मदत न मिळाल्याने पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत तीनपैकी एकच शिक्षक उपस्थित होते. एक शिक्षिका व शिक्षक गैरहजर आढळल्याने तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तपासणीत स्वच्छतागृहांची दुरवस्था निदर्शनास आली. त्याच प्रमाणे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे आढळले. या स्थितीत तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावातील इतर सुविधांची त्यांनी पाहणी केली. गावात नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. त्याबद्दल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाईसर्व यंत्रणांकडून नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नागरिकांसाठी शासनाने दिलेल्या सेवा-सुविधांत प्रशासनाकडून काहीही कसूर राहता कामा नये. आपण यानंतरसुद्धा मेळघाट व जिल्ह्यात सर्वदूर वेळोवेळी अचानक तपासणी करणार आहोत. कर्तव्यात कसूर होत असल्याचे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.मेळघाटातील रस्त्यांची कामे १५ दिवसांत सुरू कराचिखलदरा : वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीअभावी चिखलदरा मुख्यालयाला जोडणाºया दोन्ही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडले आहेत. ती सर्व कामे अधिवेशनापूर्वी १५ दिवसांत सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक पालिकेत सोमवारी स्वागत समारंभानंतर अधिकाºयांची त्यांनी बैठक घेतली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमारेषा वाढल्याने चिखलदरा पर्यटनस्थळाला जोडणाºया परतवाडा-धामणगाव गढी व घटांग मार्गावरील मुख्य रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.तूर खरेदीसाठी लागवडीचे पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावीअमरावती : आंतरपीक म्हणून तुरीचे अर्धे क्षेत्र नव्हे, लागवडीखालील पूर्ण क्षेत्र गृहीत धरून उत्पादकता निश्चित करावी व त्यानुसार खरेदी करण्यात यावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी पणन महासंघाच्या अधिकाºयांना दूरध्वनीवरून दिले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाणीपुरवठा योजनांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, आवश्यक तेथे सर्वेक्षण करुन उपाय योजावेत, असे निर्देश त्यांनी दिले.