शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

संत्र्याच्या आंबिया बहराला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:09 IST

पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादक चिंताग्रस्त : १० ते १५ टक्के फळे टिकण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे. कृषी विभागाने यावर संशोधन करून उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी संत्रा उत्पादकांकडून केली जात आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ओळख केवळ संत्रा पिकामुळे आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरचे संत्रा क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांनी माना खाली टाकल्या, तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे काही दिवसांत तोडण्यायोग्य होत असताना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा कहर झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने तापमानामध्येसुद्धा वाढ झाली आहे. संत्रा आंबिया बहाराचे पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी तीव्र पाणीटंचाई आणि अतितापमानामुळे उन्हाळ्यात फळगळती झाली, उरलेली फळगळती आता होत असल्याने आंबिया बहराचे काय होणार, हा प्रश्न आहे.आॅगस्ट महिन्यात बोट्रिओडिप्लोडिआ, कोलीटोट्रिकम व काही अंशी अल्टरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होत असून, बुरशी फळाच्या देठातून फळामध्ये आंत जावून पूर्ण वाढ झालेल्या फळाचे नुकसान करतात. अन्नद्रव्याची कमतरता हेसुद्धा कारण असण्याची शक्यता आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास, त्वरित पुरवठा केल्यास हा रोग नाहिसा होऊ शकतो.- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारीजुलै ते आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असल्याने शासनाने संत्राउत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक अनुदान जाहीर करावे.- विजय श्रीराव,माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजपअज्ञात रोगामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने केवळ १० ते २०टक्के संत्राफळे टिकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संत्रा आंबिया बहर टिकला नाही, तर उत्पादकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागेल. कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकºयांना अनुदान द्यावे.- उद्धव फुटाणे,संत्राउत्पादक, तिवसाघाट

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती