शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संत्र्याच्या आंबिया बहराला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:09 IST

पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादक चिंताग्रस्त : १० ते १५ टक्के फळे टिकण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे. कृषी विभागाने यावर संशोधन करून उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी संत्रा उत्पादकांकडून केली जात आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ओळख केवळ संत्रा पिकामुळे आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरचे संत्रा क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांनी माना खाली टाकल्या, तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे काही दिवसांत तोडण्यायोग्य होत असताना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा कहर झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने तापमानामध्येसुद्धा वाढ झाली आहे. संत्रा आंबिया बहाराचे पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी तीव्र पाणीटंचाई आणि अतितापमानामुळे उन्हाळ्यात फळगळती झाली, उरलेली फळगळती आता होत असल्याने आंबिया बहराचे काय होणार, हा प्रश्न आहे.आॅगस्ट महिन्यात बोट्रिओडिप्लोडिआ, कोलीटोट्रिकम व काही अंशी अल्टरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होत असून, बुरशी फळाच्या देठातून फळामध्ये आंत जावून पूर्ण वाढ झालेल्या फळाचे नुकसान करतात. अन्नद्रव्याची कमतरता हेसुद्धा कारण असण्याची शक्यता आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास, त्वरित पुरवठा केल्यास हा रोग नाहिसा होऊ शकतो.- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारीजुलै ते आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असल्याने शासनाने संत्राउत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक अनुदान जाहीर करावे.- विजय श्रीराव,माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजपअज्ञात रोगामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने केवळ १० ते २०टक्के संत्राफळे टिकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संत्रा आंबिया बहर टिकला नाही, तर उत्पादकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागेल. कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकºयांना अनुदान द्यावे.- उद्धव फुटाणे,संत्राउत्पादक, तिवसाघाट

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती