शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मर रोगाने संत्रा बागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

फोटो - पान ३ ची लिड अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यात फळगळीने संत्राउत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. कुठे ...

फोटो -

पान ३ ची लिड

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर तालुक्यात फळगळीने संत्राउत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. कुठे कमी, तर कुठे अधिक ही फळगळ आहे. यातच काही संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे फळासकट उभी वाळत आहेत. मर रोगामुळे ही झाडे सुकत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अचलपूर तालुक्यातील काकडा, इसापूर, श्यामपुर, शिंदी बु., हनवतखेडा, दर्याबाद यांसह अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात मर रोग बघायला मिळत आहे. यात आंबिया बहराच्या संत्राफळांनी लदबदलेली हिरवीकंच झाडे जागेवरच फळासकट सुकली आहेत.

तालुक्यातील अनेक भागात संत्रा झाडावरील फळगळ आजही सुरू आहे. काही भागात माशीचा प्रादुर्भावही आढळून आला आहे. यात संत्राउत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

कृषी विभाग बघ्याच्या भूमिकेत

संत्राउत्पादक शेतकरी आणि संत्राबागा संकटात सापडल्या असतानाही कृषी विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. फळगळ आणि मर रोग व संत्र्यावरील अन्य संकटांविषयी कुठलेही परिणामकारक मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाने पोहचविले नाही. या फळगळीची किंवा मर रोगाची साधी दखलही कृषी विभागाला घ्यावीशी वाटली नाही.

कृषी अधिकारी नॉट रिचेबल

फळगळ आणि मर रोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मागील दोन दिवसांपासून ते फोन उचलत नाहीत. ‘आय विल कॉल यू लेटर’ असा मेसेज ते टाकत असले तरी त्यांनी दोन दिवसांमध्ये परत फोन केलेला नाही.

बदली करून घेण्यात व्यस्त

प्राप्त माहितीनुसार, अचलपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माती परीक्षण विभागात बदली करून घेण्यास फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. तेथेही दोन अधिकारी इच्छुक आहेत. या दोघांपैकी एकाची राज्यमंत्र्यांनी, तर दुसऱ्याची कॅबिनेट मंत्र्यांनी शिफारस केली आहे. यात कोणाचे पारडे जड पडते, याकडे कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.