शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर

By admin | Updated: April 5, 2017 00:04 IST

शासनासह यंत्रणेच्या बेपर्वावृत्तीचा फटका संत्र्याच्या निर्यातीला बसला आहे.

यंत्रणेच्या बेपर्वाईचा फटका : फळांमध्ये आंबा, द्राक्षे, केळी आघाडीवरअमरावती : शासनासह यंत्रणेच्या बेपर्वावृत्तीचा फटका संत्र्याच्या निर्यातीला बसला आहे. मागील चार वर्षांचा आढावा घेता इतर फळांच्या तुलनेत निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर असल्याचे शासनाचे आर्थिक व्यवहाराच्या अहवालात नमूद आहे. यामध्ये आंबा,द्राक्ष व केळी आघाडीवर आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील संत्रा माघारला आहे.सातासमुद्रापार नागपुरी संत्र्याची ओळख हल्ली कमी होऊ लागली आहे. निर्यात धोरणात अलिकडे झालेल्या बदलानंतर संत्रा उत्पादकांना प्रोत्साहन मिळायला हवे. मात्र, राज्यात संत्र्याचा उतरता प्रवास सुरू आहे. या तुलनेत कोकणातील आंब्याने बाजी मारली आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात देशातील १२ हजार २९५ टन संत्र्याची निर्यात झाली व ३२ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये राज्यातील २७३ टन संत्र्याचा समावेश आहे. राज्यातील आंब्याला ३०६ कोटी निर्यातमूल्य मिळाले. दुसऱ्या स्थानावर द्राक्ष आहेत. देशातून ६९ हजार ५९९ टन द्राक्षाची निर्यात झाली व ५३५ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये राज्यातील ५० हजार ९३ टन द्राक्षाचा समावेश आहे व निर्यात मूल्य ४८४ कोटी आहे. तिसऱ्या स्थानावर केळी आहेत. देशातून ८२ हजार १५३ टन केळीची निर्यात झाली व २७८ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये २८ हजार ५२८ टन केळी एकट्या महाराष्ट्रातील असून त्यांना ९७ कोटी निर्यातमूल्य मिळाले आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात देशातून १२ हजार २९५ टन संत्र्याची निर्यात झाली व याद्वारे ३२ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये महाराष्ट्रातील २७३ टन संत्र्याचा समावेश आहे. राज्याच्या वाट्याला फक्त एक कोटी निर्यातमूूल्य मिळाले आहे. शासन अर्थसहाय्यीत तसेच अंगिकृत संस्था मात्र यापासून लांबच राहिल्या. फार तर महानगरात संत्रा महोत्सवा इतपतच त्यांनी मजल मारली. मात्र, काही सहकारी तत्वावरील संस्था व परप्रांतीय व्यापारी आणि अन्य राज्यांचे धोरण राज्याच्या तुलनेत पुढारलेले आहे. याचा थेट फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. (प्रतिनिधी)महानगरात ‘संत्रा महोत्सवा’तच धन्यताथेट उत्पादक ते ग्राहकांपर्यंत विक्री यामध्ये दोन्ही घटकांना दर्जेदार व किफायतशीर माल मिळतो. महानगरातील व्यापाऱ्यांची येथील उत्पादकांशी भेट होऊन संबंध वृद्धींगत होतात व यामधून व्यापार बहरतो. ही संत्रा महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. मात्र, अलीकडे ही संकल्पना हरविली यातून शासन निधीवर डल्ला मारण्याची प्रवृत्ती बोकाळू लागली आहे. शासना यंत्रणेच्या सहयोगाशिवाय हे शक्य नाही. अलिकडेच पुण्याला झालेल्या संत्रा महोत्सवात येथील संत्रा उत्पादकांचा नव्हे तर स्वस्त भावात विकत घेतलेला संत्रा विकत घेऊन पाठविण्यात आला व त्याची तेथे विक्री केली गेली. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे.