शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

भूमी अधिग्रहण धोरणाचा विरोध

By admin | Updated: August 4, 2015 00:06 IST

शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन : किसान जागृती अभियानातर्फे शासनाकडून सुधारणेची अपेक्षा अमरावती : शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या विषमतावादी धोरणामुळे देशात एकीकडे काही लोक झपाट्याने श्रीमंत होत आहेत तर दुसरीकडे शेतकरी, मजूर आणि कामगारांचे प्रचंड शोषण होत आहे. देशातील ७० टक्के वर्गातील वाढलेले आत्महत्यांचे प्रमाणदेखील याच विषमतेचा परिणाम आहे. श्रीमंतांच्या हाती मोठमोठ्या मशिनरी आल्याने रोजगारापासून अनेक लोक वंचित होत आहेत. त्यामुळेच कारखान्यांसाठी केल्या जाणाऱ्या भूमी अधिग्रहण विषयक धोरणाचा निषेध किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आला. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. त्याची लूट केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. इंग्रजांच्या धोरणानुसार चालणारी ही नीती बदलण्याची मागणी यावेळी निवेदनातून किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, अक्षय वानखडे, मारोती नागदिवे, शरद मेटकर, पप्पू मातकर, विजय खाटके, प्रभाकर गाढवे, सुनील भिसे, प्रदीप चांगोले, चक्रधर बायस्कर, आकाश खांडेकर, विशाल मेटकर, रमेश सोलव, पूर्णाजी ठाकरे, अतुल आमझरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु केवळ त्यांच्या जखमांवर वरवर मलमपट्टी केली जाते. मुळावर घाव घालून समस्या निकाली काढण्याकडे दिले जात नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. कारखानदारीला भाव देण्याकरिता मजुरांच्या तोंडचा घास शासन हिरावून घेऊ पाहत आहे. मोठमोठ्या यंत्रांद्वारे कामे होऊ लागली तर मजुरांच्या हातचे काम हिरावले जाईल. मग, या बेरोजगार मजुरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची नाही काय? शासनाने भूमी अधिग्रहण व शेतकरी संबंधित धोरणात आमुलाग्र बदल करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील या निवेदनातून किसान जागृती अभियानाच्या सदस्यांद्वारे करण्यात आली. अनेक कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते. (प्रतिनिधी)