शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

भूमी अधिग्रहण धोरणाचा विरोध

By admin | Updated: August 4, 2015 00:06 IST

शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन : किसान जागृती अभियानातर्फे शासनाकडून सुधारणेची अपेक्षा अमरावती : शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या विषमतावादी धोरणामुळे देशात एकीकडे काही लोक झपाट्याने श्रीमंत होत आहेत तर दुसरीकडे शेतकरी, मजूर आणि कामगारांचे प्रचंड शोषण होत आहे. देशातील ७० टक्के वर्गातील वाढलेले आत्महत्यांचे प्रमाणदेखील याच विषमतेचा परिणाम आहे. श्रीमंतांच्या हाती मोठमोठ्या मशिनरी आल्याने रोजगारापासून अनेक लोक वंचित होत आहेत. त्यामुळेच कारखान्यांसाठी केल्या जाणाऱ्या भूमी अधिग्रहण विषयक धोरणाचा निषेध किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आला. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. त्याची लूट केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. इंग्रजांच्या धोरणानुसार चालणारी ही नीती बदलण्याची मागणी यावेळी निवेदनातून किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, अक्षय वानखडे, मारोती नागदिवे, शरद मेटकर, पप्पू मातकर, विजय खाटके, प्रभाकर गाढवे, सुनील भिसे, प्रदीप चांगोले, चक्रधर बायस्कर, आकाश खांडेकर, विशाल मेटकर, रमेश सोलव, पूर्णाजी ठाकरे, अतुल आमझरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु केवळ त्यांच्या जखमांवर वरवर मलमपट्टी केली जाते. मुळावर घाव घालून समस्या निकाली काढण्याकडे दिले जात नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. कारखानदारीला भाव देण्याकरिता मजुरांच्या तोंडचा घास शासन हिरावून घेऊ पाहत आहे. मोठमोठ्या यंत्रांद्वारे कामे होऊ लागली तर मजुरांच्या हातचे काम हिरावले जाईल. मग, या बेरोजगार मजुरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची नाही काय? शासनाने भूमी अधिग्रहण व शेतकरी संबंधित धोरणात आमुलाग्र बदल करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील या निवेदनातून किसान जागृती अभियानाच्या सदस्यांद्वारे करण्यात आली. अनेक कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते. (प्रतिनिधी)