शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

राज्य नियामक मंडळाला पतसंस्थाचा विरोध; रीट पिटीशन करणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 16:41 IST

प्रमुख पतसंस्थांच्या सभेत निर्णय

अमरावती : पतसंस्थांचे कामकाजावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन केलेले आहेत. याला विदर्भातील पतसंस्थांनी विरोध दर्शविला आहे. शासनाने या कायद्याला स्थगनादेश न दिल्यास उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ क्रेडिट को-ऑप सोसायटी फेडरेशनचे दिलीप राजूरकर यांनी सांगितले.

विदर्भातील प्रमुख पतसंस्थांच्या पदाधिकाºयांची सभा नागपूर येथील नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात दिलीप राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये विदर्भातील पतसंस्थांच्या पदाधिकाºयांनी या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. हा कायदा शासनाने मागे घ्यावा याकरिता शासनाला सभेच्या तीव्र संवेदना निवेदनाव्दारे व्यक्त करण्यात येईल व नंतर न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्यात येणार असल्याचे राजूरकर म्हणाले.

कायद्यातील तरतुदीअन्वये सहकारी बँकांच्या मोठ्या प्रमाणावर शाखांचा विस्तार झाला. त्यातच केंद्रीय कायद्यान्वये पंजीबद्ध झालेल्या मल्टिस्टेट पतसंस्था व त्यांच्या शाखांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीअन्वये देशातील सर्व सहकारी संस्थांना स्वायत्तता प्रदान केलेली आहे. मल्टिस्टेट पतसंस्थांना नियामक मंडळाच्या कायदेशीर तरतुदीनुसारच कामकाज करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील कायद्यानुसार पंजीबद्ध झालेल्या पतसंस्थांना व्यवसाय वाढीवर बंधने येणार आहेत. सहकारी कायद्यातील जाचक अटींमुळे पतसंस्थांचे व्यवहार कमी होऊन, मल्टिस्टेट पतसंस्थांना राज्यातील आर्थिक व्यवहार वाढीस पूरक वातावरण मिळणार असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आल्याचे राजूरकर म्हणाले. 

प्रास्ताविक श्रीराम मांडस्कर यांनी केले. बैठकीत राजेन्द घाटे, भंडारा फेडरेशनचे  अध्यक्ष बाळकृष्ण सार्वे, नागपूर फेडरेशनचे उपाध्यक्ष रवींद्र सातपुते,   पीपल्स नागपूरचे अध्यक्ष प्रभाकरराव लोंढे, दीनदयाल नागपूरचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी या कायद्याबाबत परखड मत नोंदविले. संचालन संत गजानन संस्था नागपूरचे अध्यक्ष स्वप्निल मोंढे यांनी केले.

या नियमानुसार मंडळाची स्थापना

शासनाने राज्यातील पतसंस्थांच्या कामकाजावर नियंत्रण आणण्याकरिता ७ सप्टेंबर २०१७ च्या राजपत्रानुसार प्रसिद्ध केलेला महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम २०१७ अंतर्गत कलम १४४-२ (अ) व ३ (अ) अन्वये महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन केले आहे. या  मंडळाचे पतसंसंस्थांवर नियंत्रण आहे. पतसंस्थाकरिता कलम १४४-४ (अ) ते १४४-३१ (अ) या विविध कलमानुसार जाचक तरतुदी असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र