शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

राज्य नियामक मंडळाला पतसंस्थाचा विरोध; रीट पिटीशन करणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 16:41 IST

प्रमुख पतसंस्थांच्या सभेत निर्णय

अमरावती : पतसंस्थांचे कामकाजावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन केलेले आहेत. याला विदर्भातील पतसंस्थांनी विरोध दर्शविला आहे. शासनाने या कायद्याला स्थगनादेश न दिल्यास उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ क्रेडिट को-ऑप सोसायटी फेडरेशनचे दिलीप राजूरकर यांनी सांगितले.

विदर्भातील प्रमुख पतसंस्थांच्या पदाधिकाºयांची सभा नागपूर येथील नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात दिलीप राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये विदर्भातील पतसंस्थांच्या पदाधिकाºयांनी या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. हा कायदा शासनाने मागे घ्यावा याकरिता शासनाला सभेच्या तीव्र संवेदना निवेदनाव्दारे व्यक्त करण्यात येईल व नंतर न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्यात येणार असल्याचे राजूरकर म्हणाले.

कायद्यातील तरतुदीअन्वये सहकारी बँकांच्या मोठ्या प्रमाणावर शाखांचा विस्तार झाला. त्यातच केंद्रीय कायद्यान्वये पंजीबद्ध झालेल्या मल्टिस्टेट पतसंस्था व त्यांच्या शाखांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीअन्वये देशातील सर्व सहकारी संस्थांना स्वायत्तता प्रदान केलेली आहे. मल्टिस्टेट पतसंस्थांना नियामक मंडळाच्या कायदेशीर तरतुदीनुसारच कामकाज करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील कायद्यानुसार पंजीबद्ध झालेल्या पतसंस्थांना व्यवसाय वाढीवर बंधने येणार आहेत. सहकारी कायद्यातील जाचक अटींमुळे पतसंस्थांचे व्यवहार कमी होऊन, मल्टिस्टेट पतसंस्थांना राज्यातील आर्थिक व्यवहार वाढीस पूरक वातावरण मिळणार असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आल्याचे राजूरकर म्हणाले. 

प्रास्ताविक श्रीराम मांडस्कर यांनी केले. बैठकीत राजेन्द घाटे, भंडारा फेडरेशनचे  अध्यक्ष बाळकृष्ण सार्वे, नागपूर फेडरेशनचे उपाध्यक्ष रवींद्र सातपुते,   पीपल्स नागपूरचे अध्यक्ष प्रभाकरराव लोंढे, दीनदयाल नागपूरचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी या कायद्याबाबत परखड मत नोंदविले. संचालन संत गजानन संस्था नागपूरचे अध्यक्ष स्वप्निल मोंढे यांनी केले.

या नियमानुसार मंडळाची स्थापना

शासनाने राज्यातील पतसंस्थांच्या कामकाजावर नियंत्रण आणण्याकरिता ७ सप्टेंबर २०१७ च्या राजपत्रानुसार प्रसिद्ध केलेला महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम २०१७ अंतर्गत कलम १४४-२ (अ) व ३ (अ) अन्वये महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन केले आहे. या  मंडळाचे पतसंसंस्थांवर नियंत्रण आहे. पतसंस्थाकरिता कलम १४४-४ (अ) ते १४४-३१ (अ) या विविध कलमानुसार जाचक तरतुदी असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र