शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उगवणक्षमता तपासूनच करा सोयाबीनची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST

दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकांना अवेळी पावसामुळे ...

दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकांना अवेळी पावसामुळे फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बियाणांची गुणवत्ता खराब झाली आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दर्यापूर तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सरासरी १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सद्यस्थितीत तालुक्यात शेतकऱ्यांकडे ६,६८८ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असून, ३,३१२ क्विंटल इतक्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे, त्यांनी विक्री न करता घरचेच सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन बियाण्यांची पेरणी करताना उगवणक्षमता तपासूनच बियाणे पेरणी योग्य असल्याची खात्री करावी व जीवाणू संघाची बीज प्रक्रिया घ्यावी.

अशी करावी पेरणी

तीन – चार सेमी इतक्या खोलीवर करावी. पेरणी करताना ७५ – १०० मिमी इतका पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. सोयाबीन बियाण्यांची पेरणी करताना बीबीएफ तसेच पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास बियाण्याची बचत होईल. त्याचबरोबर उत्पादनात वाढ हेाते. किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणी योग्य समजावे. सोयाबीन हे स्वयं परागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बाजारातून नवीन सोयाबीन बियाणे घेण्याची आवश्यकता नाही. पाऊस, कीड व रोग यामुळे बरेचदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते व पिकाच्या लागवडीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे ही काळाची गरज बनली आहे.

- तर उत्पादन खर्च कमी

घरचे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासून वापरल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निश्चित कमी होईल. सोयाबीनचे बाह्य आवरण नाजूक व पातळ असल्यामुळे साठवणूक व हाताळणी दरम्यान तसेच पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या अवकाळी पावसामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासूनच बियाण्यांची पेरणी करावी. तसेच पेरणी करतांना बियाण्याला बुरशीनाशक व जिवाणू संघाची बीज प्रक्रिया करावी.

कोट

पेरणीवेळी जमिनीत ७५ - १०० मिमी इतका पुरेसा ओलावा असल्यावरच पेरणी करावी. बियाणे तीन-चार सेंमी इतक्या खोलीवर पेरल्यास बियाण्यांची उगवण चांगली होईल.

- राजकुमार अडगोकर,

तालुका कृषी अधिकारी,

दर्यापूर