शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

आरटीईत सात शाळांनीच भरली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

आतापर्यंत केवळ ७ शाळांनीच आपली माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. मागील वर्षीपासून शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांना आरटीई मान्यता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । शिक्षण हक्क कायदा शिक्षण विभागापुढे नोंदणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. सन २०२०-२१ साठीची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू होत आहे. त्यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांनी आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शाळांना ६ फेब्रुवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४० शाळांनी नाव नोंदणी केली आहे.आतापर्यंत केवळ ७ शाळांनीच आपली माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.मागील वर्षीपासून शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांना आरटीई मान्यता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देताना हे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. शाळांची नोंदणी प्रक्रिया ६ फेब्रुवारी रोजी संपणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ११ मार्च रोजी प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये पूर्वप्राथमिकपासून ते पहिलीपर्यंतची प्रक्रिया सुरू असून आरटीई प्रवेशासाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा उशीर झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेशाची प्रतीक्षा होती. या प्रक्रियेनंतर यंदा एकच सोडत काढण्यात येणार आहे.यापूर्वी २०१८ मध्ये ४ आणि २०१९ मध्ये ५ सोडत काढण्यात आल्या होत्या. यंदा आरटीईची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी कमी आहे. त्याअनुषंगाने सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांची ४ फेब्रुवारीला बैठक बोलविली आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याचे निराकरण करून नोंदणीचा वेग वाढविला जाईल.- नितीन उंडे,उपशिक्षणाधिकारी, प्राथमिकएकाच टप्यात सोडतशिक्षण हक्क कायद्याअतंर्गत (आरटीई)२०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठीची २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे.यंदा प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून तीन फेºयाऐवजी प्रवेशासाठी एकाच टप्यात सोडत काढण्यात येणार आहे.त्यासाठी यावर्षी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र