शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आरटीईत सात शाळांनीच भरली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

आतापर्यंत केवळ ७ शाळांनीच आपली माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. मागील वर्षीपासून शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांना आरटीई मान्यता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । शिक्षण हक्क कायदा शिक्षण विभागापुढे नोंदणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. सन २०२०-२१ साठीची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू होत आहे. त्यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांनी आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शाळांना ६ फेब्रुवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४० शाळांनी नाव नोंदणी केली आहे.आतापर्यंत केवळ ७ शाळांनीच आपली माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.मागील वर्षीपासून शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांना आरटीई मान्यता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देताना हे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. शाळांची नोंदणी प्रक्रिया ६ फेब्रुवारी रोजी संपणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ११ मार्च रोजी प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये पूर्वप्राथमिकपासून ते पहिलीपर्यंतची प्रक्रिया सुरू असून आरटीई प्रवेशासाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा उशीर झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेशाची प्रतीक्षा होती. या प्रक्रियेनंतर यंदा एकच सोडत काढण्यात येणार आहे.यापूर्वी २०१८ मध्ये ४ आणि २०१९ मध्ये ५ सोडत काढण्यात आल्या होत्या. यंदा आरटीईची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी कमी आहे. त्याअनुषंगाने सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांची ४ फेब्रुवारीला बैठक बोलविली आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याचे निराकरण करून नोंदणीचा वेग वाढविला जाईल.- नितीन उंडे,उपशिक्षणाधिकारी, प्राथमिकएकाच टप्यात सोडतशिक्षण हक्क कायद्याअतंर्गत (आरटीई)२०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठीची २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे.यंदा प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून तीन फेºयाऐवजी प्रवेशासाठी एकाच टप्यात सोडत काढण्यात येणार आहे.त्यासाठी यावर्षी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र