शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत फक्त २७.७८ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१६ टक्के पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती अमरावती/ संदीप मानकर मे महिन्यातील उन्हाच्या चटक्याने प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे झपाट्याने ...

नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१६ टक्के पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती

अमरावती/ संदीप मानकर

मे महिन्यातील उन्हाच्या चटक्याने प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. यासंदर्भात २७ मेपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये फक्त २७.१८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा प्रथमच पाणीटंचाई जाणवली नसली तरी दोन आठवडे तरी पाण्याचा जपून वापर करावा लागणार असल्याचा अंदाज जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मान्सून अद्याप अंदमान-निकोबारपर्यंतच असला तरी विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी काही जिल्ह्यांमध्ये दररोज कोसळत आहेत. मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.

प्रकल्पांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. पिण्याच्या पाण्याची जरी अद्याप कुठेची चिंता नसली तरी गतवर्षीसारखे प्रकल्प शंभर टक्के भरले, तरच पुढील वर्षी सिंचनाला व पिण्याच्या पाण्याची सोय होईल. पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी २७.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ३३.१६ टक्के, २५ मध्यम प्रकल्पात ३०.४९ टक्के, तर ४७७ लघु प्रकल्पांत फक्त १७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजून किमात दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४४.८६ टक्के पाणीसाठा आहे. ही अमरावती जिल्हाकरिता चांगली बाब आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २२.३५ टक्के, अरुणावती १९.६७ टक्के, बेंबळा प्रकल्प ३८.३३ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २९.०४ टक्के, वान ३५.९९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २९.५४ टक्के, पेनटाकळी १९.८३ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कोट

अंदमान-निकोबार निघून मान्सूनचा पाऊस सोमवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व काही सुरळीत राहिल्यास विदर्भात तो १० जूननंतर पोहोचण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कमी-जास्त प्रमाणात चालृू राहील. यंदा पाऊस चांगला आहे.

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती.