शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

२१ हजार रेशन कार्डधारकांनाच मिळाले डीबीटीचे अनुदान; लाभार्थींचाही कानाडोळा

By जितेंद्र दखने | Updated: July 5, 2023 18:53 IST

एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यावर प्रतिलाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या हस्तांतरणाची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.

अमरावती: एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यावर प्रतिलाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या हस्तांतरणाची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत १४ पैकी ६ तालुक्यांतील २१ हजार ६० लाभार्थींना ९४ लाख ७७ हजार ६१० रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र, अजूनही आठ तालुक्यांतील पात्र असलेल्या लाभार्थींनी आपल्या अनुदानाच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियाच पूर्ण केलेली नसल्याने असे एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थी अनुदानापासून दूर आहेत.

राज्य शासनाने एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना यापुढे धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. जिल्हाभरात एपीएल शेतकरी कार्डधारकांची संख्या ९३ हजार ११९ एवढी आहे. यामध्ये आतापर्यंत पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील अचलपूर, अमरावती ग्रामीण, चांदूर बाजार, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या सहा तालुक्यांमधील २१ हजार ६० एपीएल शेतकरी लाभार्थींना जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंतचे अनुदान शासनाकडून लाभार्थी रेशन कार्डधारकांच्या बँक खात्यात जमा केले, तर उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मात्र लाभार्थींकडून योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया केली जात नसल्याने या तालुक्यांतील लाभार्थींना अनुदानाची रक्कम उपलब्ध असताना लाभ देता येत नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. या तालुक्यांत संथगतीने प्रक्रियाअमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चिखलदरा, भातकुली, तिवसा, वरूड, मोर्शी, धारणी या नऊ तालुक्यांत लाभार्थींकडून लाभाच्या अनुदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. ही प्रक्रिया या ठिकाणी संथगतीने सुरू आहे. तालुकानिहाय लाभ मिळालेले कार्डधारक

  • अचलपूर - २,६८९
  • अमरावती ग्रामीण - १४
  • चांदूर बाजार - ४,७२२
  • दर्यापूर - ४,६८९
  • धामणगाव रेल्वे - २,८८४
  • नांदगाव खंडेश्वर - ६,०६२

 एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना शासनाने धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. आतापर्यंत २१ हजारांवर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींनी पुरवठा विभागाकडे रीतसर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. डी.के. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती