अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा रस्त्यावर विक्रीला आला आहे. त्यामुळे दरवर्षी रडवणारा कांदा यावर्षीसुध्दा रडवणार का, असा प्रश्न व्यापारी व ग्राहंकाना पडला आहे. गारपिटीमुळे शेतकर्यांच्या कांदाचेही नुकसान झाल्याने कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. नवाथे नगर व दुर्गाविहार चौकात कांदाची रस्त्यावर विक्रीला सुरुवात झाली असून शेतकरी थेट ग्राहकांपर्यंंत कांदा विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत १0 रुपये किलोने कांदा विक्री होत आहे. मात्र पुढील काही दिवसात कांदा १00 गाठणार का, असाही प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे कांदा खरेदीकरिता नागरिकांना आतापासूनच ओढ लागली आहे. गारपिटीमुळे विदर्भातील शेतकर्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा लागवडीवरही मोठा परिणाम जाणवला आहे. त्यातच नाशिकमधील कांद्याचे उत्पन्न घटले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्यांना होण्याची शक्यता वर्र्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
कांदा आला रस्त्यावर
By admin | Updated: May 13, 2014 23:10 IST