शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

एक लाख २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार बूट अन् पायमोजे

By जितेंद्र दखने | Updated: June 24, 2024 20:17 IST

१४ तालुक्याला निधी वाटप : शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी

अमरावती : ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शासकीय, जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील शालेय विद्यार्थ्यांना येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून शासनाकडून मोफत गणवेशापाठोपाठ बूट आणि दोन मोज्याची जोडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख २० हजार ५४७ विद्यार्थ्यांसाठी सुमारे दोन कोटी ४९ लाख दोन हजार ९९० रुपयांची खरेदी संबंधित शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जाणार आहे. यासाठीचा निधी शिक्षण विभागाने १४ पंचायत समितींना वितरित केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना मोफत गणवेशासोबतच आता दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येणार आहेत. या वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करावयाची असल्याने या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्याला सुमारे दोन कोटी ४९ लाख रुपये, तसेच बूट, पायमोज्याकरिता ८२ कोटी ९२ लाख दोन हजार ९९० रुपये इतका निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यामधून १४ तालुक्यांतर्गत येणाऱ्या एक हजार ६६८ शाळेतील सुमारे एक लाख २० हजार ५४७ शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

यंदा शासनाने त्यांना मोफत बूट देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी समग्र शिक्षा अभियानातून जिल्ह्याला दोन कोटी ४९ लाख २ हजार ९९० रुपये मिळाले आहेत. हे पैसे गुरुवार, १३ जून रोजी सीईओ संतोष जोशी यांच्या आदेशाने तालुकास्तरावर वितरित केले आहेत. एसएमसीच्या शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे खरेदी करण्याचे आदेश आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशासोबत बूट आणि पायमोजेही दिले जाणार आहेत.

असा मिळाला तालुक्यांना निधीअचलपूर २१,७६,६८०,अमरावती १२,७५,१७०,अंजनगाव सुजी ११,८०,४८०,भातकुली ९,१९,३६०, चांदूर बाजार १६,३२,८५०, चांदूर रेल्वे ८,२४,१६०, चिखलदरा १६,८७,४२०, दर्यापूर १२,७६,३६०, धामणगाव रेल्वे ९,४४,६९०, धारणी ३३,७०,९३०, मोर्शी १५,९३,२४०, नांदगाव खंडेश्वर १२,४६,४४०, तिवसा ८,९९,६४०, वरूड १४,६५,५७० असे एकूण २,०४,९२,९९० रुपयांचा निधी वितरित केला आहे.येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे दिले जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. याकरिता शिक्षण विभागाने बूट अन् पायमोजे खरेदीसाठी निधी वितरित केला आहे.-बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती