शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST

शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

अमरावती : शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.शेतकरी संघटनांची सुकाणू समितीद्वारा एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. यामध्ये शहरात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरी संघटना, राज्य किसान सभा, संभाजी ब्रिग्रेड, जिजाऊ ब्रिग्रेड, मराठा सेवा संघ, प्रहार शेतकरी संघटना, किसान जागृती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जय किसान आंदोलन आदी संघटनांचा सहभाग होता.डॉ.स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादनखर्च अधिक दीडपट उत्पन्नावर अधारित हमी भाव द्या व शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकरी, मजूर, ग्रामीण कारागीरांसाठी पेन्शन कायदा लागू करा, मासिक १० हजार रूपये पेन्शन द्या, वनजमिनीचे पट्टे द्या, बोंडअळीने कपाशी पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या, शेती बियाणे, अवजारावरील जीएसटी रद्द करा, कृषिपंपाला मोफत वीजपुरवठा करा, यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी एक दिवसीय आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा चांदूर रेल्वेत निषेधचांदूर रेल्वे : येथे अन्नत्याग आंदोलनात सचिन जाधव, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, प्रा. प्रसेनजित तेलंग, विवेक गावंडे, विलास आसोले, महेमुद हुसैन, संजय डगवार, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, सुधाकरराव थेटे, विनोद लहाने, गौतम जवंजाळ, अरूण बेलसरे, महादेवराव शेंद्रे, भीमराव खलाटे, चंदू बगाडे, अजय वाघ, बिपीन देशमुख, रामदास निस्ताने, शिवाजीराव चौधरी, सागर दुर्योधन, विजय रोडगे, कृष्णकांत पाटील, अशोक हांडे, नंदू खेरडे, सुशिल कछवे, राजू गायकवाड, संदीप ढोणे, शंकर गावंडे, प्रशांत शिरभाते, अमीत अलोने यांसह अनेक शहरवासी सहभागी झाले होते. १२ डिसेंबर १९९८ रोजी अशाच आंदोलनात शेतकरी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात प्रकाश नानाजी काळे (राजना-नेकनानपूर), प्रमोद जवळकार (शिरपूर), गणेश शिंदे (भातकुली) मरण पावले. त्यांचे स्मरणसुद्धा यावेळी झाले.