शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

२०० दिवसांमध्ये उकळली एक कोटींची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST

कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ ...

कॉमन

प्रदीप भाकरे

अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

यावर्षी झालेल्या ४३५ ट्रॅपमध्ये ६०० जणांना अटक करण्यात आली, तर गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. यात वर्ग १ चे ४०, वर्ग २ चे ५६, वर्ग ३ चे ३४४, वर्ग ४ चे २९, ६३ खासगी लोक व ६८ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या ६०० जणांना तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच घेताना वा मागणी सिद्ध झाल्याने अटक करण्यात आली. यात वर्ग १ च्या लाचखोरांनी २८ लाख ४९ हजार लाच उकळली. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांनी १५ लाख ८५ हजार २०० रुपये, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांनी ५३ लाख ९१ हजार ७५० रुये, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी ४ लाख ४ हजार, अन्य लोकसेवकांनी ३ लाख २६ हजार ९०० रुपये, तर खासगी व्यक्तींनी ४ लाख १२ हजार ८०० रुपये लाच म्हणून घेतल्याची नोंद एसीबीने घेतली आहे.

बॉक्स

मार्चमध्ये सर्वाधिक ट्रॅप

यंदाच्या जानेवारीत एसीबीने ६२ ट्रॅप यशस्वी करीत ८७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. फेब्रुवारीत ६६ ट्रॅपमध्ये ८५, मार्चमध्ये ८८ ट्रॅपमध्ये ११९, एप्रिलमध्ये ४९ ट्रॅपमध्ये ६६, मेमध्ये ४७ मध्ये ७४, जूनमध्ये ७७ सापळ्यात १०३ तर, जुलैच्या १९ तारखेपर्यंत ४६ ट्रॅपमध्ये ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.