शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

एक एकर शेती, तीही पाण्याखाली

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी

शेताचे झाले तळे : जगावं कसं? भेलकर कुटुंबाचा सवालअमरावती : तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी या शेतात जमा होते. एका पावसाने शेताचा तलाव तयार झाला, सोयाबीन पाण्याखाली सडले. आता जगावं कसं, असा प्रश्न या परिवारासमोर उभा ठाकला आहे. शेंदूरजनाबाजार ते रघुनाथपूर रस्त्यावर रामदास भेलकर यांचे शेत सर्व्हे नंबर १४७/३ एक एकर शेत आहे. या शेतावर भेलकर परिवाराची उपजिविका, लगतच्या रस्त्याचे मातीकाम व खडीकरण करताना रस्त्यावर रपटा किंवा पूल बांधण्यात आला नाही. तसेच रस्त्याच्या काठाने नाली काढण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस आल्यास लगतच्या सर्व शेतामधील पाणी भेलकर यांच्या शेतात जमा होते. शेतामधील पीक सडून जाते. यंदादेखील भेलकर यांनी सोयाबीनचे महागड बियाने, खत, पेरणी व मजुरी असे १० हजार रूपये खर्च केले, सोयाबीन पेरणीदेखील साधली होती. पीक डौलात असताना पावसाच्या पाण्यामुळे शेतात तळ साचले. सोयाबीन पाण्याखाली सडत आहे. भेलकर परिवाराजवळ एक एकर शेतीशिवाय उपजिवीकेचे दुसरे कुठलेच साधन नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन, विनंती, आर्जव सर्व काही झाले. शेतकऱ्यांचे नुकसान दिसत असताना यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे जगावं कसं, हा भेलकर परिवाराचा अस्वस्थ करणारा सवाल आहे. (प्रतिनिधी)