शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला ३१७ गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न लागला मार्गी

By जितेंद्र दखने | Updated: August 17, 2023 19:16 IST

दरम्यान, जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी स्वतः या योजनांच्या चाचणीचा आढावा घेतला आहे.

- जितेंद्र दखने

अमरावती : जलजीवन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागणार असून, १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ६६१ पैकी ३१७ योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गावांत वाड्या वस्त्यांवर पहिल्यांदाच नळ योजना आल्याने स्थानिक आबालवृद्धांसह चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य शासनाची फलश्रृती असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी स्वतः या योजनांच्या चाचणीचा आढावा घेतला आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत मेळघाटसह जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. अतिदुर्गम, दुष्काळी तसेच वाड्यावस्त्यांना प्रतिमाणसी ५५ लिटर प्रतिदिन शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतून ६६१ गावांसाठी ६६१ योजनांची कामे घेण्यात आलेली आहे. यातील ५० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामेही दिलेल्या मुदतीत पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ६६१ मधील ३१७ योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली असून या योजनेद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. पुढील काळात संबंधित योजनांची किरकोळ उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनांच्या माध्यमातून वरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यातील काही गावांना पहिल्यांदा नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. जलजीवन योजनेमध्ये घर घर जल पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

तालुकानिहाय योजना पूर्ण गावेअमरावती १६, अचलपूर ५३, भातकुली ०२,चांदूर रेल्वे १०, चांदूर बाजार ०६, चिखलदरा ६०, धामणगाव रेल्वे ३२, धारणी ८५, मोर्शी ०३, नांदगाव खंडेश्वर १२, तिवसा १४, वरुड २४ एकूण ३१७

मुख्यकार्यकारी यांच्या मार्गदर्शनात जलजीवन मिशनअंतर्गत कार्यात्मक नळजोडणी, जुन्या योजनेची सुधारणा व नवीन योजना अशी ६६१ कामे असून त्यापैकी ३१७ कामे पूर्ण झालेली असून त्याची यशस्वी चाचणी झालेली उर्वरित सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण नियोजन आहे.- संदीप देशमुखकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागजिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Waterपाणी