शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हनुमान जयंतीला आला ‘आनंदाचा शिधा’, वितरण सुरू

By जितेंद्र दखने | Updated: April 4, 2023 17:15 IST

५ लाख ५५ हजार ६४३ लाभार्थी

अमरावती : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या काळात शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, गुढीपाडव्याला हा शिधा लाभार्थ्यापर्यत पोहोचू शकला नाही. आता हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १९१४ रेशन दुकानातून वितरण सुरू झाले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जात होता. करोना सुरू केले होते. आता मोफत धान्य बंद करून स्वस्त धान्यच मोफत दिले जात आहे. याबरोबर दिवाळीला आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. यात १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो 'चनाडाळ आणि १ किलो पामतेल अशा चार वस्तूंसाठी असलेला संच १०० रुपयांत देण्यात आला. या योजनेचा विस्तार करून गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या काळात अंत्योदय आणि प्राधान्य गटासाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करण्यात आली.

हा शिधा वेळेत मिळावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यानी व्यक्त केली असता गुढीपाडव्याला अन्न धान्य वितरण अधिकान्यांकडे साहित्यच पोहोचले नव्हते. रवा आणि चनाडाळ तेल,साखर आदी साहीत्या कमी प्रमाणात प्राप्त झाले होते. अशातच ६० टक्यापेक्षा जास्त साठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता सर्व साहित्य प्राप्त झाले असून वितरण सुरू झाले असल्याने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ६४३ शिधापत्रिका धारकांना शिधा मिळणार आहे. उर्वरित साहित्य लवकर मिळावे, यासाठी केंद्रीय भंडार विभागाकडे संपर्क साधण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.'असे आहेत लाभार्थी

अंत्योदय रेशनकार्ड : १ लाख २५ हजार ६३२प्राधान्य गट रेशनकार्ड : ३ लाख ४३ हजार २८२एकूण रेशन दुकाने -१९१४

आनंदाचा शिधा संचाचे ६० टक्के साहीत्य उपलब्ध झाले आहे.या शिधा जिन्नसचे वितरण रेशन दुकानामार्फत सुरू केलेले आहे. उर्वरित संच पुरवठा करण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केलेला आहे.त्यामुळे लवकरच मागणीनुसान संच उपलब्ध होतील.आणि महिन्या अखेर वितरण पूर्ण होईल.

- डी.के.वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावतीfoodअन्न