शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जुनी पाठयपुस्तकेही आता दप्तरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

अमरावती : शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके ...

अमरावती : शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे दिसून येते. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पुस्तक पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना वितरित झालेली लाखो पुस्तके वापरात येणार असल्याने यात लाखो रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेत लाखाेंच्या संख्येने पुस्तकांचे वाटप केले जाते. यापोटी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेष म्हणजे, एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरल्यास दोन ते तीन वर्षे सहज उपयोगात आणला जाऊ शकतो. मात्र, पुनर्वापरावर भर न दिल्याने दरवर्षी नवी पुस्तके वाटपाची योजना सुरू आहे.

बॉक्स

पुनर्वापराचा निर्णय

शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी एकदा वापरलेल्या पाठपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी, हा यामागील उद्देश आहे.

बॉक्स

प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठपुस्तकांपैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे, अशी पुस्तके संकलित करून पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिलेली आहे. यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठपुस्तके जमा होतील तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोट

यासंदर्भात शासन पातळीवरून पत्र मिळाले आहे. सदर पत्रातील सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.

- ई.झेड.खान,