शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जुनी परिपत्रके कालबाह्य, आदेश, निर्णयात होणार सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

अमरावती : पंचायत राज अंतर्गत शासननिर्णय, आदेश, परिपत्रकांमध्ये आता काळानुसार बदल होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला ...

अमरावती : पंचायत राज अंतर्गत शासननिर्णय, आदेश, परिपत्रकांमध्ये आता काळानुसार बदल होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. याकरिता अभ्यास समिती गठित केली आहे. ही समिती जिल्ह्याचा दौरा करून हरकती, सूचना ऐकून घेणार आहे. यावर लेखी हरकती, सूचना येत्या १५ दिवसांत पाठवाव्या लागतील. याबाबत जिल्हा परिषदेत २६ फेब्रुवारी राेजी आदेश धडकले.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती यांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी पंचायत राज अधिनियमांतर्गत शासनाकडून दरवेळी परिपत्रके काढली जातात, आदेश दिले जातात, शासननिर्णय घेतले जातात. पण, काळानुरूप बदल झालेले नसल्यामुळे अंमलबजावणीवरून बरेचदा संभ्रम निर्माण होतो. उदाहरणार्थ ग्रामीण मुख्यालयी राहणे, विविध बैठकांना प्रत्यक्ष उपस्थिती आणि विविध रजिस्टर तपासणी या नियमांमुळे बरेचदा वादाच्या व कारवाईच्या प्रसंगाला समोरे जावे लागते. काळ बदलला, वाहतुकीची साधने वाढली, तशी मुख्यालयात राहण्याची सक्ती, व्हीसी असल्याने प्रत्यक्ष बैठकीला उपस्थिती आदी मुद्दे बाजूला पडले आहेत. त्यामुळे काळाप्रमाणे त्यात बदल व्हावा, अशी मागणी होत होती. आता ग्रामविकास विभागाने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागाचे उपायुक्त पी.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केली आहे. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेईल. ज्यांना कुणाला लेखी म्हणणे द्यायचे आहे, त्यांनी लेखी स्वरूपात पाठवावे, असे आवाहन समितीने केले आहे.

ग्रामविकास उपसचिव लहुराज माळी यांनी अध्यादेश काढल्यानंतर अभ्यास समितीचे अध्यक्ष पाटील यांनी लगेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र काढून याबाबत सूचना केल्या. जुने शासननिर्णय, परिपत्रक यात काय सुधारणा करता येतील हे सुचवावे, असे या पत्रात म्हटले आहे.