शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धाचा फिव्हर, मुख्यालयात बहुतांश विभागात शांतता 

By जितेंद्र दखने | Updated: February 15, 2024 01:57 IST

१४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर हा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होत आहे.

अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना बुधवार, १४ फेब्रुवारीपासून येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर अधिकारी व कर्मचारी क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने जिल्हा परिषदेची बहुतांश यंत्रणा ही क्रीडा महोत्सवाचे यजमान पद असल्याने कामात गुंतली आहे. परिणामी मिनी मंत्रालयात सर्वत्र क्रीडामय वातावरण असल्याचे येथील मुख्यालयात दिसून आले. यामुळे प्रत्येक विभागात शांतता पसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बरेच अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. परिणामी महत्त्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून, किमान सोमवारपर्यत तरी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा क्रीडा महोत्सवाचा फिव्हर कायम राहणार असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. 

१४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर हा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा अंबानगरीत होत असल्याने गत चार ते पाच दिवसांपासून मिनी मंत्रालयाची यंत्रणा या कामात व्यस्त आहे. १६ला क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार आहे. लगेच १७ फेब्रुवारीला शनिवार शासकीय सुटी आहे. त्यानंतर रविवार व सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची शासकीय सुटी असल्याने सलग आठवडाभर अधिकारी आणि कर्मचारी रिलॅक्स होणार असले तरी सर्वसामान्यांना मात्र चांगलेच टेन्शन येणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रीडा महोत्सव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर पार पडला आणि आता एका महिन्यात पुन्हा विभागीय क्रीडा महोत्सवाची धूम सुरू आहे.

पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेस्टहाऊस फुल्लक्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धेसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्थासुद्धा जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहासह, पदाधिकारी असलेल्या सभापतींच्या शासकीय निवासस्थानांमध्ये केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या फिलगुल वातावरण पाहायला मिळत आहे.

केवळ क्रीडा स्पर्धेशी संबंधित तसेच आयोजन समितीमधीलच कर्मचारी या क्रीडा महोत्सवात आहेत. उर्वरित कर्मचारी आपापल्या विभागातच कर्तव्यावर आहेत. कामानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नयेे, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.डाॅ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ जीएडी 

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद