शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कार्यालये, शाळा क्लिन

By admin | Updated: October 3, 2014 01:03 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली.

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी ते शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने सहभाग नोंदविला. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच कळावे यासाठी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात आला.‘क्लिन इंडिया २०१९’ या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला २ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. जगदीश सायसिकमल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सकाळी ८ वाजतापासून जिल्हा परिषदेत सर्व विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन आपली कार्यालये स्वच्छ केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील धूळ कचरा हाताने स्वच्छ करीत कार्यालय व परिसर स्वच्छ केला. याशिवाय सर्व विभागांतही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जे. एन. आभाळे, सिंचनचे यू. जे. क्षीरसागर, भालेराव, भाऊराव चव्हाण, चंद्रशेखर खंडारे, कैलास घोडके, सोळंके, संदीप देशमुख, येवले यांच्यासह पकंज गुल्हाने, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, प्रदीप बद्रे, प्रशांत सातव, दर्शना गौतम, सोपान लांडगे, गंधे, संजय राठी, गजानन कोरडे, संजय गिरी, सुहास चौधरी, नाल्हे, राठोड तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.आदिवासी विकास विभागातही स्वच्छता अभियान उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त किशोर गुल्हाने यांच्याहस्ते महात्मा गांधी यांचे फोटोचे पूजन करून थोर पुरूषांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शपथ दिली.