शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

कार्यालये, शाळा क्लिन

By admin | Updated: October 3, 2014 01:03 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली.

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी ते शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने सहभाग नोंदविला. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच कळावे यासाठी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात आला.‘क्लिन इंडिया २०१९’ या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला २ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. जगदीश सायसिकमल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सकाळी ८ वाजतापासून जिल्हा परिषदेत सर्व विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन आपली कार्यालये स्वच्छ केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील धूळ कचरा हाताने स्वच्छ करीत कार्यालय व परिसर स्वच्छ केला. याशिवाय सर्व विभागांतही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जे. एन. आभाळे, सिंचनचे यू. जे. क्षीरसागर, भालेराव, भाऊराव चव्हाण, चंद्रशेखर खंडारे, कैलास घोडके, सोळंके, संदीप देशमुख, येवले यांच्यासह पकंज गुल्हाने, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, प्रदीप बद्रे, प्रशांत सातव, दर्शना गौतम, सोपान लांडगे, गंधे, संजय राठी, गजानन कोरडे, संजय गिरी, सुहास चौधरी, नाल्हे, राठोड तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.आदिवासी विकास विभागातही स्वच्छता अभियान उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त किशोर गुल्हाने यांच्याहस्ते महात्मा गांधी यांचे फोटोचे पूजन करून थोर पुरूषांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शपथ दिली.