शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळा टिकविण्यासाठी अधिकारीही लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : राज्य शासनाने शालेय पटसंख्या आणि गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांबरोबरच आता शासकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा जबाबदारी देण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण ...

अमरावती : राज्य शासनाने शालेय पटसंख्या आणि गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांबरोबरच आता शासकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा जबाबदारी देण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण विभागाने शासकीय शाळा टिकविण्यासाठी एक दिवस शाळेसाठी असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे.

खासगी शाळांमधील वाढती विद्यार्थीसंख्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळती लक्षात घेऊन आता सरकारी शाळा टिकविण्याच्या कामात केवळ शिक्षकच नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांना ही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. या बाबतीत शासनाचे परिपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वर्ग १ आणि २ चे अधिकारी यांनी एका वर्षात किमान तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. तसेच हा उपक्रम आनंददायक होण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर वर्ग एक आणि दोन शासकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेत भेट देऊन संबंधित शाळांच्या भौतिक आणि गुणवत्तेची तपासणी करावयाची आहे. या व्यतिरिक्त चालू अभ्यासक्रमाच्या काही भागांचे अध्ययन अधिकार्‍यांनी करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आणि त्यांच्या एकूणच आकलन शक्तीचेही मूल्यमापन करावयाचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांनी त्या-त्या गावांतील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश वाढवण्याबाबत उपायोजना करायचे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळेतील भौतिक सुविधा क्रीडा साहित्य स्वच्छतागृह शालेय पोषण आहार याचे मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करावयाचा आहे. या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायतराज, ग्रामविकास महसूल विभागाचाही सहभाग असेल, असे आदेशात नमूद आहे.

कोट

सरकारी शाळांची पटसंख्या व गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागाचे आदेश आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागासोबतच अन्य विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार. सीईओंच्या आता नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन केले जात आहे.

- ई.झेड खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक