शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शाळा टिकविण्यासाठी अधिकारीही लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : राज्य शासनाने शालेय पटसंख्या आणि गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांबरोबरच आता शासकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा जबाबदारी देण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण ...

अमरावती : राज्य शासनाने शालेय पटसंख्या आणि गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांबरोबरच आता शासकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा जबाबदारी देण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण विभागाने शासकीय शाळा टिकविण्यासाठी एक दिवस शाळेसाठी असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे.

खासगी शाळांमधील वाढती विद्यार्थीसंख्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळती लक्षात घेऊन आता सरकारी शाळा टिकविण्याच्या कामात केवळ शिक्षकच नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांना ही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. या बाबतीत शासनाचे परिपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वर्ग १ आणि २ चे अधिकारी यांनी एका वर्षात किमान तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. तसेच हा उपक्रम आनंददायक होण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर वर्ग एक आणि दोन शासकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेत भेट देऊन संबंधित शाळांच्या भौतिक आणि गुणवत्तेची तपासणी करावयाची आहे. या व्यतिरिक्त चालू अभ्यासक्रमाच्या काही भागांचे अध्ययन अधिकार्‍यांनी करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आणि त्यांच्या एकूणच आकलन शक्तीचेही मूल्यमापन करावयाचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांनी त्या-त्या गावांतील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश वाढवण्याबाबत उपायोजना करायचे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळेतील भौतिक सुविधा क्रीडा साहित्य स्वच्छतागृह शालेय पोषण आहार याचे मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करावयाचा आहे. या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायतराज, ग्रामविकास महसूल विभागाचाही सहभाग असेल, असे आदेशात नमूद आहे.

कोट

सरकारी शाळांची पटसंख्या व गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागाचे आदेश आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागासोबतच अन्य विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार. सीईओंच्या आता नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन केले जात आहे.

- ई.झेड खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक