शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पोषण माह अभियान चुलीपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

(फोटो आहे) अमरावती : राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले पोषण माह अभियान आता घराघरात चुलीपर्यंत पोहोचल्याचे पाहून समाधान झाल्याची प्रतिक्रिया ...

(फोटो आहे)

अमरावती : राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले पोषण माह अभियान आता घराघरात चुलीपर्यंत पोहोचल्याचे पाहून समाधान झाल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षीही देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वातोंडा रहिमतपूर आणि वाकी रायपूर या दोन गावातील अंगणवाड्यांना भेट देऊन पोषण माह अभियानाचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा ना. यशोमती ठाकूर यांनी घेतला. यावेळी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि त्याला मिळणारा गावकऱ्यांचा प्रतिसाद याबाबत माहिती करून घेतली. अंगणवाडी सेविकांना गावातून मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम असून हे अभियान आता प्रत्येक घरातील चुलीपर्यंत पोहोचेल, याची ग्वाही अंगणवाडी सेविकांनी दिली आहे. त्यासंदर्भात केलेल्या कामकाजाची आकडेवारी, शून्य ते सहा वयोगटातील मुलांची नोंद, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आहाराविषयी ठेवलेल्या नोंदी आणि घेतलेली काळजी यासोबतच सकस आणि चौरस आहाराचे महत्त्व गावकऱ्यांना कशा पद्धतीने पटवून दिले जात आहे, याचे प्रात्यक्षिकच या अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर सादर केले. या अभियानाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहतात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणि राज्यात अमरावती जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर बोलून दाखवला. यावेळी परसबागेचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देत त्यांच्यापर्यंत परसबागेचे किट आणि काही झाडांची रोपे अंगणवाडी सेविकामार्फत पोहचवण्यात आली संपूर्ण आणि सकस आहार हाच निरोगी आयुष्याचा मूलमंत्र असल्याचे यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे. या दोन अंगणवाड्यांप्रमाणेच जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रत्येक अंगणवाडीत पोषणाचे महत्त्व सांगितले जात असून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या पोषण माह अभियानांतर्गत सर्व ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा राज्य पहिल्या क्रमांकावर या अभियानात नक्की येईल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

000