शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१४८ शाळांची पटसंख्या दहाच्या आतच; १ ते ३ विद्यार्थी संख्या असलेल्या २२ शाळा

By जितेंद्र दखने | Updated: August 25, 2023 19:31 IST

प्रसाधनगृहांसह, खेळांच्या मैदानांचीही उणीव आहे. इतर आवश्यक सुविधाही नाहीत.

अमरावती - शैक्षणिक, भौतिक, क्रीडा, कला व इतर आधुनिक सुविधा तसेच शिक्षकांचा अभाव, घसरत चाललेली गुणवत्ता आदी बाबींनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. १ ते ३ पटसंख्येच्या २२ तसेच ४ ते १० पटसंख्या असलेल्या १२७ शाळा जिल्ह्यात आहेत.राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारी मोफत पुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, मोफत प्रवास या बाबींचा लाभ घेण्याऐवजी पैसे खर्च करून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या १४ तालुक्यात सुमारे १ हजार ५८६ शाळा आहेत. यापैकी १४८ शाळांची पटसंख्या ही १ ते १० च्या आत आहे.

झेडपी शाळांमध्ये पटसंख्या घटण्याची कारणेइमारती जुन्या व शिकस्त आहेत. वर्गखोल्या, बसण्याची चांगली व्यवस्था नाही. अशा शाळांमध्ये पाल्याला पाठवण्यास पालक धजावत नाहीत. प्रसाधनगृहांसह, खेळांच्या मैदानांचीही उणीव आहे. इतर आवश्यक सुविधाही नाहीत. यामुळे पाल्याचे भविष्य उज्वल होणार नसल्याची पालकांची धारणा होत चालली आहे.खासगी शाळांचे प्रस्थ वाढल्यामुळे पालकांचा तिकडे ओढा अधिक वाढला आहे. 

तालुकानिहाय १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळाअचलपूर - ०८अमरावती - १३अंजनगाव सुर्जी - २२भातकुली - २०चांदूर बाजार - ११चांदूर रेल्वे - ०८चिखलदरा - ०५दर्यापूर - २२धामणगाव रेल्वे - ०५धारणी - ०१मोर्शी - ०५नांदगाव खंडेश्वर - ०९तिवसा - ०८वरूड - ११एकूण - १४८कोट

जिल्हा परिषदेच्या या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्यापैकी बहुतांश शहराजवळ गैरआदिवासी भागात आहेत. मेळघाटात कमी प्रमाण आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.- बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी,