शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

नापिकीने ७ महिन्यांत १८५ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2015 00:27 IST

जिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.

धक्कादायक अहवाल : ६५ युवा शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्युलागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १८ ते ४० वयोगटातील ६५ युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक अहवाल आहे. थकीत कर्जामुळे ६४ शेतकऱ्यांनी मृत्युचा फास जवळ केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ दरम्यान १९५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले. यंदाच्या जुलै महिन्यात सर्वाधिक ३६ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १९, एप्रिलमध्ये २३, मे महिन्यात २९ व जूनमध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यंदा कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्याने ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ४८ आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. कालव्याअभावी ३, बोअर अभावी ३ व सिंचनासाठी विहिरी नसल्यामुळे ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पैकी २६ प्रकरणे पात्र ठरली आहेत. कौटुंबिक कलहामुळे ४ शेतकऱ्यांनी, खासगी कर्जामुळे १, आजारपणामुळे ५ व इतर कारणांमुळे ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ही सर्व प्रकरणे अपात्र ठरली.