शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

नापिकीची नुकसान भरपाई दिली, पण मतदानाचा अधिकार नाकारला

By admin | Updated: March 13, 2015 00:19 IST

शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि हिताचे रक्षण करणाऱ्या बाजार समित्यांमध्ये जेथून प्रतिनिधी पाठविले जातात, ...

सुदेश मोरे अंजनगाव सुर्जीशेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि हिताचे रक्षण करणाऱ्या बाजार समित्यांमध्ये जेथून प्रतिनिधी पाठविले जातात, त्या गाव सोसायटीमध्ये मतदान करण्यापासून ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.एकीकडे नापिकीची नुकसान भरपाई द्यायची व दुसरीकडे थकीत कर्जदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घ्यायचा, हा विचित्र विरोधाभास आहे. ही शासनाची भूमिका लोकशाहीलासुद्धा मारक आहे. यासोबतच जमीन कसणाऱ्या हजारो खातेधारक शेतकऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत कोणतेच स्थान नाही. एकट्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३२ हजारांवर खातेदार शेतकरी आहेत. त्यातील फक्त तीन हजार शेतकरी गाव सोसायट्यांचे सदस्य आहेत. थकीत कर्जदार वगळता अवघ्या हजार-दोन हजार सभासदांमधून बाजार समिती सदस्य निवडले जातील. तालुका पातळीवर ३० हजार शेतकऱ्यांना हक्काच्या संस्थेत मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेचा शासनाने फेरआढावा घेणे आवश्यक आहे.अनेक वर्षांपासून सहकारी संस्थेत नवीन सभासदांना कर्ज देणे व नवीन सभासद स्वीकारणे बंद आहे. आधीच्या सर्व नाममात्र सभासदांना अनेक सहकारी संस्थांनी अपूर्ण शेअर्स, थकबाकीदार आदी विविध कारणास्तव मतदानापासून वंचित ठेवले आहे. गाव सोसायट्या वर्षानुवर्षे काही विशिष्ट लोकांच्या ताब्यात आहेत. हीच मंडळी निवडणूक लढवितात आणि बाजार समितीवर प्रतिनिधीदेखील पाठवितात. गावातील उर्वरित शेतकऱ्यांना ही निवडणूक लढविता येत नाही. बाजार समितीही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची व मोठ्या आर्थिक उलाढालीची संस्था आहे. परंतु त्यातही गावकऱ्यांचा सहभाग नसतोच. पण बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे व हिताचे काम करणाऱ्या या संस्थेत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे शेतकरी प्रतिनिधी या संस्थेत दिसत नाहीत. राजकीय सोयीसाठी ग्रामपंचायतीचा आणि सहकारी संस्थेचा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. पण, शेतमाल विक्री प्रक्रियेत या दोन्ही संस्थांचा काडीचाही संबंध नाही. जिल्हा पातळीवर चार लाखाचेवर शेतकरी मतदान हक्कापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी करून अल्पभूधारक, सर्वसाधारण, मागासवर्गीय, शेतकरी अशी वर्गवारी करून त्यांची नावे मतदार यादीत टाकल्यास त्यांना घटनात्मक हक्क प्राप्त होईल. शेतमालाच्या विक्रीचा संबंध शेतकऱ्यांशी असल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड शेतकऱ्यांमधून व्हावी.