शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : वर्धा जिल्ह्यात थोपविली कन्हान रेतीची वाहने अमरावती : जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली. वाळूमाफियांचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १९२ रेतीघाटांमधून दोन ब्रासपेक्षा अधिक रेतीची वाहतूक व नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेतीची १० ब्रासपेक्षा अधिक बेधूंद वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एकाच आठवड्यात चार नागरिकांचा बळी गेला. मात्र, महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाद्वारा या वाहनांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने हे वाळूमाफिया मस्तवाल झाले आहेत. 'ओव्हरलोड' वाहतुकीमुळे वाळूघाटालगतच्या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक गावांमध्ये तर शेतकऱ्यांना वहिवाटीचे रस्तेच उरले नाहीत. अनेक नवीन रस्त्यांची या जड वाहतुकीने पुरती वाट लागली आहे. अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीमुळे दररोज लाखोंच्या महसुलाची खुलेआम चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाचे बेपर्वा धोरण चीड आणणारे होते. याविषयीचे सविस्तर वृत्त मंगळवारच्या अंकात प्रकाशित होताच महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गंभीर दखल घेऊन रेतीवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी व कुठलाही मुलाहिजा न करता धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. वाळूमाफियांची सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तिवसा येथे रात्रंदिवस तपासणी सुरु आहे. त्यातप्रमाणे सर्व तालुक्यांत भरारी पथकांनी वाळू वाहतुकीची तपासणी करून कारवाईचे आदेश देण्यात आले.वाळूमाफियांचे धाबे दणाणलेअमरावती : भरारी पथकालादेखील कडक निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या महसूल विभागाच्या धडक मोहिमेमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. रेतीघाटातून येणारे प्रत्येक वाहन अगदी नियमानुसार दोन ब्रास रेती घेवून निघत आहे. कन्हान रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारी वाहने वर्धा जिल्ह्यात कारंजा परिसरात थोपवून धरली आहेत. ही वाहने छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रविष्ट होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात सर्व ठिकाणी महसूल, पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांची तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.