शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

आता वाहनांकरिता वेगमर्यादा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:01 IST

याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस विभागाकडून अधिसूचना : प्रत्येक मार्गावर राहणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सुमारे ३० टक्के प्राणांतिक अपघात हे वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहन चालविल्याने होतात. त्यामुळे वाहनांना वेगमर्यादा घालून देणारी अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाने जारी केली आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते, चढउतार आदी बाबींचा विचार करून महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावर समतल भागात ९० व घाटातून ५० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. या वाहनांनी महापालिकेच्या क्षेत्रातील द्रुतगती मार्गावर व सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतल भागात ८० व शहरी क्षेत्रात घाट असल्यास ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ओलांडू नये. राष्ट्रीय किंवा राज्य दोन किंवा अधिक मार्गिका असलेल्या महामार्गावर विभाजक नसल्यास किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्ते असल्यास समतल भागात ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाची मर्यादा ठेवावी. नगरपालिका क्षेत्रात समतलमधील मर्यादा ६० व घाटातील ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित केली आहे.मालमोटारी व नऊ प्रवासी वाहनांसाठी वेग मर्यादामालमोटारी तसेच वाहनचालकासह नऊ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांंची वाहतूक करणाºया वाहनांसाठी वेगमर्यादा जवळपास सारखी आहे. अशा वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावर समतलमध्ये ८० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावरही हीच वेगमर्यादा असेल. महानगरी क्षेत्रातील द्रुतगती सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर दोन किंवा अधिक मार्गिकेच्या विभाजक नसलेल्या किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्त्यात समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितासची मर्यादा आहे. नऊ प्रवासी वाहनांनी नगरपालिका क्षेत्रात समतलमध्ये ५० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. नगरपालिका क्षेत्रात मालमोटारींना समतलमध्ये ४० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे.दुचाकी वाहनेदुचाकी वाहनांना चार मार्गिका विभाजित रस्त्यावर समतल रस्त्यावर प्रतितास ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. महानगरी सहा किंवा चार मार्गिका विभाजित द्रुतगती रस्त्यावर तसेच दोनहून अधिक जास्त मार्गिकेच्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर दुचाक्या समतलमध्ये प्रतितास ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील.

 

टॅग्स :highwayमहामार्ग